Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Wednesday, May 27, 2009

दु चाकी - भाग 6

"कस दिल रे ताक?" महेश ने विचारले, "पाच रुपये" बाबुने उत्साहाने सांगितले. "मग ठिक आहे, त्याआधी एक सांग वर कुठून म्हणजे कोणत्या वाटेने जायचे?" "हे बघा, ही जी समोरून वाटजाते ती हाय सोपी पण पोचायला दिड तास तरी लागल आणि एक वाट मागनं हाय जरा अवघड आणि झाडाझुड्पाची हाय, पण तीनं एक पाच-सहाशे पायर्‍या कमीबी होतील आणि तासाभरात गडावबी पोचु आपण." बाबुचे शब्द पुर्ण होतात न होतात सर्वजण एक सुरात म्हणाले, "आता गड सर करायचा तर मागच्या वाटेनेच हर हर महादेव,हर हर महादेव.." सर्वांनी चढाईस सुरवात केली. रात्रभर प्रवास करून सर्वांचे चेहरे अगदी शिनले होते; परंतु आता एकच ध्येय होत ते म्हणजे गड सर करायचा. सर्वात पुढे डोक्यावर कळशी आणि हातात ग्लासं गेतलेला बाबु आणि त्याच्या मागे हे सहाजण अत्यंत शिस्तीने पादक्रमण करत होते. एक वीस पंचवीस मिनिटातच तेजस ने धापा टाकायला सुरवात केली.

त्याला बघुन इनायत म्हणाला, "साले बोलता था ना ज्यादा फुका मत कर. साला जवानी मे तेरी ये हालत है?" "हा यार अभी ज्याते ही सब छोड दुंगा", यावर दिपकने मागे वळुन पाहीले व काहीसे वात्रट हसत म्हणाला, "वंदे वंदे आणि च्यु.... बनवायचे धंदे. गेल्या वर्षभरात याने दहा वेळा हीच प्रतीज्ञा केली, पण ज्याप्रमाने मुंगी साखरेचा वास काढत डब्यापर्यंत पोहचते त्याप्रमाणे हाही जेवल्यावर पानापट्टीवर पोहचतो. सुरवातीला रोज एक अशी कधीतरी ओढतो म्हणुन घ्यायचा आणि आता साला पाकीटच ठेवतो खिशात." त्यास जोड म्हणुन गणेशने री ओढली, "धुंवा धुंवा....धुंवाही धुंवा" तेजस मात्र असहायपणे धापा टाकत ऐकत होता. सुश्या आणि महेश मात्र बाबुचा इंटरव्ह्यु घेण्यात रमले होते. बाबु शाळेत सातवीला होता त्याच गाव तिथेच चालत दोन तासांच्या अंतरावर होत. घरचीपरिस्तिथी बेताचीच त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हा इथे ताक विकुन पैसे कमवत असे तर आई वडील दुसर्‍याच्या शेतात मजुरीवर काम करत. घरी अजुन दोन भावंड होती, हे सर्व ऍकुन दोघांचेही चेहरे विषण्ण झाले. एकाच क्षणात त्यांना खेळण नाही मिळाल म्हणुन आई-वडीलांवर रुसणारी उलट बोलनारी मुल आठवली तर इथे आयुष्याचा खेळ चालावा म्हणुन झगडणारी मुल पाहायला मिळत होती.

एक तासाभरात सर्वजण नाना दरवाज्यापर्यंत पोहचले. दरवाज्याच्या आतील बाजुस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यांस देवड्या म्हणतात. आत शिरताच गणेशणे "गो ब्राम्हण प्रतीपालक.....छत्रपती शिवाजी महाराज की जय!" अशी रोमांचकारीआरोळी ठोकली. सर्वजण विसावा घ्यायला तिथे थांबले. दोन ग्लास ताक रिचवल्यानंतर थोड फार फोटो सेशनही झालं. अशा प्रकारे थकत भागत, ताक पीत, शोर्य गीत बोलत, टिवल्या बावल्या करत एक दिड तासात सर्वजन गडावर पोहचले. गडावर पोहचल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर ओसांडून वाहत होता. सुश्या बोलला, "यार, आता पहीले फ्रेश होऊया नाहीतर अंगात फिरण्यासाठी त्राण उरणार नाही." तेजसची तर दातखिळीच बसली होती तो नुकत्याच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णासारखादिसत होता. "अरे इथे कुठे पाणी आहे का?" दिपक ने बाबुला विचारले, "हो हाय की इथुन पुढेसरळ चालत गेलात की गंगासागर तलावाच्या बाजुला पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत व आंघोळीचीही व्यवस्था आहे." "गेलात म्हणजे? तु नाही येणार आमच्या बरोबर?" "आलो असतो पण दिवसात कुठे तीन चार फेर्‍या खाली वर केल्या तरच सुटतात शे-दिडशे रुपये. तेवढाच आई-बाला आधार", एवढ बोलुन तो पाठमोरा झाला पुढच्या गिर्‍हाईकांच्या शोधात पुन्हा तीच आरोळी ताक घेणा..........र का ताक्क..........!

गणेश बसल्याजागीच पेंगत होता. त्याला दिपकने हलवले "साहेब ऊठा. दोन तासात आपल्याला गड पाहुन परतीच्या प्रवासावर निघायचे आहे." ते ऐकून सर्वांनाच भान आले. अर्ध्या पाऊन तासात सर्वांच्या आंघोळी झाल्या. ऊन बर्‍यापैकी जाणवत होत परंतु फ्रेश झाल्यामुळे सर्वांच्या चेहर्‍यावर तरतरी आली होती. आता पुढचा प्रवास्. गडावर पाहण्यासारखी एकूण पंचवीस ठिकाणे आहेत. खुबलढा बुरुज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, पालखी दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकार पेठ, कुशावर्त तलाव, टकमक टोक, हिरकणी बुरुज, महादरवाजा, चोरदिंडी, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, जगदिश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, वाघ दरवाजा आणि अत्यंत शोभनीय असे मेघडंबरी म्हणजे महाराज राजसभेत ज्या आसनावर बसत ती जागा. शिवकालीन सिंहासनहे बत्तीसमन सोन्यापासुन बनवले होते परंतु संभाजी राज्यांच्या म्रुत्युनंतर मुघलांनी ते काबीज केले. आता तेथे पंचधातुपासुन बनवलेले सिंहासन शासनाच्या क्रुपेने पाहायला मिळते.

संपुर्ण रायगडभ्रमण करुन सर्वजण शेवटी जगदिश्वराच्या मंदीरात पोहचले. ऊन चांगलच तापल होते, परंतु मंदीरात एक विलक्षण गारवा होता दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी थोडा वेळतेथे घालवण्याचे ठरवले. बघता बघता पाचही जनांचा डोळा लागला. महेश मात्र थकलेल्या डोळ्यांनी कधी मंदीराच्यासमोरच दक्षिनेकडे असलेल्या समाधीकडे पाहात होता तर मध्येच गाभार्‍यातील शिवलिंगाकडे. कसलतरी विलक्षण दडपण त्याला जाणवत होत पण उलगडा मात्र होत नव्हता. त्याने पुन्हा आपला कटाक्ष गाभार्‍यातील पिंडीवर टाकला आणि या ऐतिहासिक वास्तुची जी काही हेळसांड झाली ती तो आठवु पाहत होता. तेव्हा त्याला जाणवले की कित्येक ठिकाणी दारुच्या बाटल्या, प्लास्टीकच्या वस्तु, फळांच्या साली इस्त:त पडल्या होत्या, त्यात भर म्हणुन प्रेमी युगुलांनी स्वताच्या नावाने रंगवलेल्या ऐतिहासिक जागा. बहुतेक त्यांना archies किंवा hallmark चे ग्रीटिंग्स परवडत नसावेत? तर काही ठिकाणच्या वास्तु पुढच्याभेटीत पाहायला मिळतील की नाही अशा कंडिशनमध्ये होत्या, जर स्वराज्याच्या राजधानीचीच ही अवस्था तर बाकीच्या गडकोटांचा विचार न केलेलाच बरा. यावरुन खरच शासनाच या सर्व गोष्टींकडे किती लक्ष आहे व महाराजांच्या कार्याविषयी खरंच किती आस्था आहे याची प्रचीती आली.


(क्रमशः)

No comments: