Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, May 18, 2009

दु चाकी - भाग 5

महडला पोहचल्यावर सर्वांना हायस वाटलं. महेश म्हणाला, "काय मग कसं वाटल? होतं की नाही adventurous". "साल्या गप्प बस, गेल्या २४ वर्षात जेवढे नामस्मरण नाही केलं देवाचं तेवढे गेल्या तीन तासात झालय माझ्याकडुन, साला एके ठिकानी तर गाडी घातलीच होतीस पण नशीब बलवत्तर म्हणुन वाचलो आपण", सुश्या अत्यंत आगतिकपणे म्हणाला. "सॉरी यार पण त्या काळोख्या अंधारात आणि गडद धुक्यात तो ट्रक दिसलाच नाही मला, पण बाईक कंट्रोल केली ना! उगी आता रडायचं नाही हं हं हं हं..........", "नाही यार, पण रस्ता खरोखरच फार भयान वाटत होता, त्यात भर की काय म्हनुन ते रस्त्यावरचे बोर्ड, 'नजर हटी दुर्र्घटना घटी!', 'अपघात प्रवण क्षेत्र' आयला पार घाबरवुन टाकला आपल्याला", तेजस चे हे बोल ऐकुन दिपक मात्र मनोमन सुखावला, नाहीतर हा (तेजस) कुठे जाऊन आला की अशा काही बढाया मारायचा की ऍकनार्‍याच्या कानाचे पडदे दयेची भिक मागायचे.

"महाराज्यांच्या क्रुपेने इथवर सुखरुप पोहचलो; आता पाऊन एक तासातच किल्ले रायगड", चष्म्याच्या आत डोळे चोळत गणेश म्हणाला, तर इनायत मात्र पैसे देउन भाषण बघायला आलेल्या माणसांसारखा त्या पाच जणांचे बोल ऐकण्यात दंग होता. पहाटेचे साडे चार वाजले होते, गारवा फारच जाणवत होता, परंतु अतिउत्साहाने सर्वांनी त्या काकडत्या थंडीवरही मात केली. किल्ले रायगड महडच्या उत्तरेस मुख्य महामार्गापासुन आत २५ कि.मी वर आहे. मुख्य रस्त्यावरच दोन शिवकालीन सिंहस्तंभ येणार्‍या पर्यटकांचे स्वागत करतात. त्या दोन सिंह स्तंभाना पाहील्यावर सर्वांना एक अनोख स्फुरण चढले, त्यातच सुशांतने 'जय भवाणी जय शिवाजी' अशी रक्त सळसळवणारी नादमय आरोळी ठोकली आणि सर्वजन रायगडाच्या दिशेने कुच झाले. एक पाऊनएक तासातच सर्वजण पायथ्यानजीकच्या पाचाडात पोहचले, तेथुन डाव्याबाजुचा रस्ता थेट राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे जातो तर उजव्याबाजुने सरळ वर गेल्यास किल्ले रायगड निधड्या छातीने स्वागतासाठी सज्ज दिसतो.

बाईक वरुन पुढे जात असताना सर्वांची नजर गावातील विहिंगम द्रुश्य अ:क्षरक्ष टिपुन घेत होती. सुर्यनारायन नुकतेच सह्याद्रीच्या डोंगर रांगातुन डोकाऊन पाहात होते. त्या त्यांच्या सौम्य तेजाने सारे आसमंत पिवळ्या केशरी रंगाने न्हाऊन गेले होते जनु काही एखाद्या निष्णात चित्रकाराने आपल्या कल्पनेच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर रंग भरले असावेत. सगळीकडे झुंजूमुंजू झाले होते त्यात पाखरांचा चिवचिवाट, दारासमोरील रांगोळीचा सडा, गुरांचे हंबरने त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा खळखळाट, गवताचा मन कासावीस करणारा वास हे सर्व बघता बघता सारे गडाच्या पायथ्याजवळ पोहचले.

समोरच एक उपहारग्रुह आहे तिथेच सर्वांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आणि गरमागरम कट वड्यावर येथेच्छ ताव मारला. खाता खाताच दिपक बोलला "ए खाऊन जाल्यावर पहीले फ्रेश होऊया आणि मग चढायला सुरुवात करुया", तेवढ्यात हॉटेलमालकाने कळवले की तेथे पाण्याची थोडीफार टंचाई आहे तुम्हाला पाणी गडावरच मिळेल ते ऐकुन सुश्यांत बोलला "हा यार नाहीतरी आपला अवतार एकदम द्रुष्ट लागण्यासारखा झाला आहे. साला एखाद्या मुलीने पाहीले तर झालेली लाईन तुटायची",यावर सर्वजण हसले. "आणि हो पाण्याच्या बाटल्या इथुनच घेऊया. परत वर जाई पर्यंत पाणी नाही" गणेशने सुचवले व त्याच्या म्हणण्याप्रमाने सर्वांनी बाटल्या भरल्या आणि चढाईस सज्ज झाले. हॉटेलातुन बाहेर पडताच चार-पाच चॉदा पंधरा वर्षांची मुल हातात ताकाने भरलेली कळ्शी आणि ग्लास घेऊन धावत त्यांच्या दिशेने आली त्यापैकी एकाचे नाव विचारले असता त्याने बाबु असल्याचे सांगितले, "ओ दादा, ताक घेणार का? घेत असाल तर तुमच्या बरोबर वरपर्यंत येईन आणि गडबी फिरवीन, आणि ताक पित रहाल तर दम बी न्हाय लागणार". त्याचं ते एवढ्याश्या वयातल व्यवहारी कसब पाहुन सर्वांना फार कुतुहल वाटले.



(क्रमशः)

No comments: