Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, December 7, 2015

शापित गड भाग ३ अंतीम

  
पंडीतच्या वेषातील समर वर्मा मंदगतीने तटबंदीवरील सैनिकांच्या मानवंदना स्विकारत पुढे चाल करत होता. त्याच्या चेहरयावर एक आसुरी समाधान दिसत होतं. तो जसजसा आगेकुच करत होता तस-तसा त्याच्या मागचा प्रदेश आत्ताच रंग-रंगोटी केल्याप्रमाणे उजळुन निघत होता. नाना पिशाच्च प्रगट होऊन या वरातीत आता सामील होऊ लागले होते. एखाद्या छबीन्या प्रमाणे सर्व त्याच्या मागुन जल्लोषात चालले होते. त्यांच्या आनंदाला पारावार ऊरला नव्हता कारण काहीच तासांनी त्यांना त्यांचा राजा मिळणार होता.
 
इकडे राजकुमारी आरोही मला आणि भिवाला घेऊन पुन्हा राजवाड्यात आली. अर्थात यावेळी आम्ही तिच्या बंदीस्त  पालखीतुनच राजभवनात प्रवेश केला होता. तिच्या दालनात येताच तिने भोईंना हातानेच जाण्याची खुण केली. आता इथुन पुढे काय आणि कस करायच याची मला आणि भिवाला काहिच कल्पना नव्हती. मी सहज आरोहीला विचारल, "आम्ही इथे आहोत याचा त्याला संशय आला तर?",  "तर काय? माझ्याबरोबर कायम राहाव लागेल गडावर! त्याचे गुलाम बनुन" आरोही काहीशी हसतच म्हणाली. मी मनात म्हणालो, "तुझ्याबरोबर राहायला मिळतय तर गुलामच काय काहिही होण्याची माझी तयारी आहे". आरोही पुढे बोलु लागली, "हे पहा काळजीच कारण नाही! समर वर्मा आधी संपुर्ण गडाला प्रदक्षिणा  घालुण सर्व पिशाच्चांना जाग्रुत करेल. त्यानंतर हि सर्व जत्रा गडाच्या मागच्या बाजुने घनदाट जंगलातुन वेताळाच्या मंदीरापाशी जाईल. तिथे पोहचताच सुर्योदय होण्यापुर्वी तो मंत्रोच्चारण करुन मंदीरा समोरील अग्नीकुंडात स्वताला झोकुन देईल व वेताळाला प्रसन्न करुन पुन्हा जिंवत होईल. त्यानंतर तो काय करु शकतो याची कल्पनाच न केलेली बरी."
 
"हे सार ठिक हाय. पण आपण फकस्त तीनजन ह्यो एवढा मोठा लवाजमा सांभाळना्र तरी कसा? त्यात आमच्याकड कसली दैवी ताकद बी न्हाय. न्हाय बा... आपल्या बाच्यान बी न्हाय व्हायच हे, मी चाललु परत. आता काय बी होऊ दे". भिवा म्हणाला.  भिवाच मध्येच अस गलितगात्र होण माझ्यासाठी त्रासदायक ठरल असत, कारण नाही म्हटल तरी त्याच्या  मुळेच मी या भीतीदायक वातावरणात तग धरु शकलो होतो. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करु लागलो. शेवटी आरोहीनेच मध्यस्ती करत आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला. "काळजी करु नका सर्वात महत्वाच, जो पर्यंत मी आहे तो पर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि राहीला प्रश्न तुमच्या भावाचा जर त्याला यातुन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला  त्याची आजची उपासना ऊधळुन लावावीच लागणार". इति आरोही.
 
आरोहीच्या धीरोत्तर शब्दांनी भिवा आता शांत झाला होता. तिनेच पुढे बोलायला सुरवात केली. "सर्वात आधी तुम्ही तुमचा पेहराव बदला. ज्यानेकरुन तुम्ही कोणी बाहेरचे नसुन आमच्यापैकीच एक वाटायला हव. राहीला प्रश्न माणसाच्या रक्ताचा ज्याच्यामुळे तुम्ही लगेच ओळखले जाऊ शकता तर मी तुम्हाला एक कुपी देइन ज्यातील द्रव्या मुळे तुमचा गंध ह्या वातावरणात विरुन जाईल." आम्ही तिथुन निघणार इतक्यात आरोही ने मला हाताने थांबण्याची खुण केली. तिने शांतपणे तिच्या तर्जनीतली अंगठी काढुन माझ्या पुढे केली.."हि तुमच्या बोटात घाला. जर मध्येच काही गडबड झाली तर ही कुपी जमीनीवर जोरात आपटा आणि अंगठी वाला हात पुढे करा त्यातील दैवी तरंगामुळे तुम्ही आलेल्या संकटातुन वाचु शकाल". माझी बोटं थोडी जाड असल्यामुळे ती अंगठी मी तर्जनीत न घालता माझ्या अनामिकेत घातली. का माहीत नाही पण आतुन मला फार बर वाटत होतं. मी तिच्या गोड चेहर्याकडे एकदम आश्वासक पणे पाहिल तेव्हा तिही माझ्याकडे काहीशी तशीच पाहत असल्याच मला जाणवल. अर्थात ही वेळ आता या सर्व गोष्टींविशयी विचार करण्याची नक्कीच नव्हती. आरोहीची कल्पना चांगली होती. पण वाघाच कातड घालुन त्याच्याच गुहेत शिरताना जी अवस्था होईल तशी अवस्था आमची झाली होती. "हे सर्व झाल्यावर आता पुढे काय? म्हणजे आपण त्याच्या पुजेत विघ्न आनणार कसं?", मी आरोहीला विचारल. यावर मंद हसत तिने भिवाकडे पाहिले, " याची व्यवस्था मी काल संध्याकाळीच केली होती त्या डुक्कराला भिवाच्या फासापर्यंत आणुन. पुढच काम भिवाने केलेलं आहेच. आपल्याला त्या डुकराच शीर लागेल. कारण ज्यावेळी त्याचं मंत्रोच्चारण अंतीम चरणाकडे जाईल त्यावेळी सभोवतालची सर्व पिशाच्च उन्मादाने अग्नी कुंडाच्या भोवताली फेर धरुन वेताळाला आळवायला सुरवात करतील, बस्स ह्याच गाफिल क्षणी आपल्याला विजेच्या चपळाईने तिथे जाऊन हे शीर त्या अग्नी कुंडात टाकायच आहे. ज्यामुळे उपासनेत विघ्न येइल आणि सभोवतालच्या सर्व अमानवीय गोष्टींचा नाश होउन हा गड शाप मुक्त होईल कायमचा". ऐकायला जरी सोप्प वाटत असल तरी हे सर्व क्रुतीत उतरवायच आहे या विचारानेच छातीत धडकी भरली.
 
गडाखाली ठाकर वाडीत भिवाच्या घरासमोर मिनमिनत्या कंदीला च्या प्रकाशा्त काहीतरी हालचाल चालु होती. भिवाच्या पोटुश्या बायकोने नवरा सकाळी दोन पोरांबरोबर वर गेला तो परत खाली आलाच न्हाय म्ह्णुन बोंब ठोकली तशी वाडीतली काही वांड पोर झोपडी समोर बसुन काहीतरी कुजबुज करत होते. भिवाचा बाप डोक्याल हात लावुन वर डोळे लावुन बसला होता. चर्चेअंती त्यांच्यातलाच एकजण उठला आणि त्याच्या बायकोला म्हणाला, "वैनी तुह्या काळजी नको करु. बस ही रात सरुंदे. सकाळच्याला पहिल्या वक्ताला आम्ही सर्वजन वर जाऊन त्या समध्यासनी धुंडतो. आता वर जायच आमच काय धाडस न्हाय. रातच्यान कसल कसल इचित्र आवाज बी वरन येऊ लागल्यात."

राजकुमारी आरोहीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे पेहराव बदलुन घेतले. मी माझा स्वीस नाईफ व ती कुपी धोतराच्या पिरवणीत लपवुन ठेवली न जानो काही वेळ आलीच तर. आम्ही दोघांनीही तिने दिलेल्या कुपीतील द्रव्य अंगावर लावले. निघण्याच्या अगोदर भोयांकरवी तिने डुकराचे शीर आणुन त्याला एका जाड कापडात व्यवस्थित बांधुन घेतले. ते शीर आता भिवाच्या पाठीवर आवरण बांधुन त्यात लपवल. म्हणजे चालताना त्याचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि समोरुन कोनी पाहील तर त्याला संशय ही येणार नाही. बस आता आम्ही पुढच्या लढाईस सज्ज झालो होतो ज्यात फक्त जिंकावच लागणार होतं नाहीतर विनाश अटळ आहे.
 
काल रात्री बाहेरुन वाडा फक्त उजळलेला दिसत होता. पण ऐश्वर्य काय असत याची अनुभुती आता प्रत्यक्षात पाहुन मिळाली. ते मखमली पडदे, झुंबर, त्यातली रोशनाई, बसायच्या गाद्या त्यावरचे लोड, काचेच नक्षीकाम, भिंतीवरील चित्र आणि या सर्व वातावरणात यांत्रिकपणे गस्त घालणारे ते सैनिक. अर्थात सार काही अमानवीय. कोणाला संशय येऊ नये म्हणुन मी आणि भिवा आरोहीच्या मागे तिच्या सेवकांप्रमाणे चाललो होतो. मगाशी आम्ही कपडे बदलायला गेल्यापासुन आरोही एकदम शांत झाली होती. तिने एकदाही माझ्याकडे पाहील नव्हतं त्यामुळेच कि काही मला खचित अस्वस्थ झाल्यासारख वाटत होतं.  
 
खाली येताच आम्ही डाव्या बाजुच्या दरवाजाने आत जाऊ लागलो. आरोही आत जाताच दोन तीक्ष्ण  भाले कैचीप्रमाणे आम्हाला आडवे आले आणि काळजात धस्स झालं. भिवाच्या पाठीवरच शीर फक्त ऊसळुन बाहेर यायचच बाकी होत. आम्ही लगेच सावरुन समोर पाहिल, चार लालबुंद डोळे आमच्याकडे खुनशी नजरेणे पाहात होते. इतक्यात राजकुमारी आरोहीने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकत त्यांना ईशार्यानेच बाजुला होण्यास सांगितले. आम्ही काहीसे गोंधळल्यासारखेच तिच्या मागोमाग आत शिरलो. थोडस चालल्या नंतर आरोहीने परत एकदा डाव वळन घेतल व ती हळुहळु एक एक पायरी खाली उतरु लागली. ती जस जशी खाली ऊतरु लागली तस तश्या बाजुच्या कळकटलेल्या मशाली प्रजव्लित होऊ लागल्या. प्रथमच आम्हाला आरोहीच्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली. भिवाच माहीत नाही पण माझी मात्र त्या पोशाखात पुरती गोची होत होती. हळु हळु पावल टाकत मी उतरत होतो. पुढे आरोही, मध्ये मी आणि मागे भिवा वळणाकार वीस-एक पायर्या उतरल्या नंतर आरोही पुन्हा उजव्या बाजुस वळाली. दहा-पंधरा पावले चालल्यानंतर अचानक ती एका भिंती समोर थांबली. तिच्या मागोमाग आम्ही सुध्दा थबकुन थांबलो. आता पुढे काय अशा प्रश्नार्थक चेहरयाने मी तिच्याकडे पाहिल तस तिने मला हातानेच पुढे यायला सांगुन भिंतीवरील दगडी चिन्हाकडे माझे लक्ष वेधले तो एक उलटा स्वस्तीक होता. तिने मला अलगद तो दगडी स्वस्तीक माझ्या डाव्या बाजुला फिरवण्यास सांगितला. मी मनात म्हणालो एवढ्या वर्षांनंतर कोणीतरी हात लावत असेल फिरेल तरी का? कि पोपट होतोय माझा! पण काय आश्चर्य स्वस्तीक अगदी अलगद फिरला. आणि दोन मोठे दगड घासताना जसा आवाज होईल तसा आवाज होऊन ती अजस्त्र दगडी भिंत अलगदपणे बाजूला झाली. अच्छा तर हाच तो "गुप्त" दरवाजा. मी आणि भिवा काहीतरी विस्मयकारक बघितल्यासारख एकमेकांच्या तोंडाकडे पाहात होतो. समोरच एक अरुंद भुयार तोंड आवासुन आमच्या स्वागतास सज्ज होतं. सात फुट ऊंच व तीन फुट रुंद अश्या त्या भुयारातुन एकच माणुस आरामात जाऊ शकत होता. आम्ही तिथुन आत आलो त्याच क्षणी पुन्हा तसाच आवाज करत तो दरवाजा बंद झाला. अस वाटल जणु काही एका अजस्त्र अजगराने आपल तोंड उघडुन आम्हाला गिळलय आणि आम्ही आता त्याच्या पोटात कायमचे बंद झालोय.
 
डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम.......... इकडे समर वर्मा त्याच्या लवाजम्यासह गडाच्या उतरणीला लागला होता. सारी भुतावळ मशाली नाचवत वाद्यांच्या आवाजात घनदाट जंगलातुन वेताळाच्या मंदीराकडे मार्गक्रम करीत होती. वाटेत येनार प्रत्येक जनावर आप-आपल्या परीने ओरडुन काहीतरी अमानवीय पाहिल्याच सांगत होतं तर हेच चित्र-विचित्र आवाज ऐकुन खाली हरवल गावात कित्येक लोकं डोक्यावर वाकाळ घेऊन निपचित पडले होते. डाव्या हातात लगाम धरुन उजव्या हाताने घोड्याच्या आयाळीवरुन ह्लका हात फिरवत रागीट डोळ्यांनी समर वर्माने वर आकाशाकडे पाहात पुटपुटले, "माझ्या उपासनेत खंड पाडणार काय? त्यासाठी आधी तुम्ही जिंवत तर राहील पाहिजे. त्याच्या चेहर्यावर क्रुर हासु उमटल. हाआहाहाहाहाआहाआ...............अजुन फक्त काहीच तास", पंडीत उर्फ समर वर्माच्या चेहर्यावरील भाव हेच दर्शवत होते.
 
गेले वीस पंचवीस मिनिटे आम्ही आरोहीच्या मागोमाग चालत होतो. कित्येक वळण घेतली असतील काहीच कळत नव्हत. भुयारातल वातावरण थंड असुनही माझ्या आणि भिवाच्या माथ्यावरुन घाम निथळत होता. थोड्याच वेळात पुन्हा एक छोटा दरवाजा लागला त्याच्या बाजुलाच दोन लहान देवड्या होत्या त्या मागे सारुन आम्ही पुढे जायला वळ्तोय तोच माझा पाय कशात तरी अडकुन मी धडपडलो माझ्या धक्क्याने भिवा सुद्धा थोडासा कलुन बाजुच्या भिंतीवर आदळला. आम्हाला अस गडबडलेल पाहुन आरोहीने मागे वळुन पाहील. पाहतोय तर दोन मानवी सापळे भिंतीला टेकुन निपचित पडले होते. त्यांच्या एकुन अवस्थेवरुन काहीतरी भंयकर त्यांनी पाहील असाव अस वाटत होतं. मला लगेच दादोसाने फॉरेनर्स बद्दल सांगितलेली गोष्ट आठवली. म्हनजे हे खालुन वर त्या दरवाज्या पर्यंत जाण्याचा प्रयत्नात होते पण मध्येच कसल्या तरी अमानवीय शक्तीने त्यांचा घात केला होता. हात देऊन मला भिवाने उठवण्याचा प्रयत्न केला तसा माझ्या मागुन कसलातरी आवाज झालेला मला जाणवला. घमम्म्म्म्म्, घम्म्म्म्म्म्म्म, घम्म्म्म्म्म्म्म, घम्म्म्म्म्म्म................तो आवाज आता हळु हळु मोठा होऊ लागला. मागे वळुन पाहिल तर आठ दहा लालबुंद डोळे आमच्याच दिशेने येत होते. आम्ही उठुन पळणार तशी आरोही आमच्या समोर उभी राहुन मोठ्या मोठ्या ने हासु लागली. तिच ते कर्णकर्कश्य हसणं छातीची धडधड वाढवत होतं. "उपासनेत व्यत्यय आणणार तुम्ही?...... हाहआहाआहाआआ अहाआहाआहाआआअ........ त्या आरोहीचा बंदोबस्त केव्हाच झालाय आता तुमची पाळी." परत मोठ्याने हसण्याचा आवाज........आता आरोहीच्या सुंदर देहाच्या जागी लाल राकट डोळे दिसत होते. तिचा नाजुक आवाज जाऊन आता घोगरा आवाज ऍकु येऊ लागला "स्स्सोड्णार नाही.... स्स्सोड्णार नाही...." आणि अचानक मागुन मानेवर जोरात कसला तरी प्रहार झाल्याची जाणीव झाली. डोळे मिटता मिटता शेवटचे काही शब्द ऍकु आले..."आज वेताळाला एक नाही तर तीन-तीन नरबळी मिळनार. ......हाहआहाआहाआआअहाआहाहाआआहाआहाअ..........."
 
हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

मंत्राच्या उच्चारणानेच मला जाग आली. मान जाम दुखत होती. सहज हात हालवायला गेलो तर कळालं हात पाय घट्ट बांधलेत. आजुबाजुला गडद अंधार होता तर समोरच वेताळाची शेंदुर लावलेली भडक मुर्ती डोळे आवासुन आमच्याकडे पाहात होती. समोर लावलेल्या दिव्यामुळे तर ती अजुनच गुढ वाटत होती. मी झटकन वळुन भिवाला शोधण्याचा प्रयत्न केला तर चार डोळे माझ्याकडेच खुनशी नजरेणे भाला रोखून पाहात होते. बाजुलाच भिवा माझ्यासारखाच असहायपणे बेशुध्दाअवस्थेत पडला होता. थोडक्यात काय तर आता खेळ संपला होता. आमच्या घरच्यांना कळनार सुध्दा नव्हत कि आमच्या बरोबर नक्की काय झाल. आणि आरोही, ती कशी काय अचानक गायब झाली? काहीच कळायला वाव नव्हता. काय झाल तिच्याबरोबर? की तो आमचा फक्त भास होता? का एखादी चाल आम्हाला यात अडकवण्यासाठीची. नाही ति अस करणार नाही. नक्कीच या हरामखोरानेच काहीतरी केल असणार. आम्ही असहायपणे त्या मंदीरात जायबंदी होऊन पडलो होतो. आता फक्त मेलेल्या कोंबडी सारखी वाट बघायची भट्टीत जायची.

बाहेर मंदीरासमोर किर्रर्र काळोखात होमातुन दाट ज्वाला येत होत्या, तर होमासमोरच समर वर्मा सर्व वस्त्र काढुन एका रिंगणात बसुन मंत्रोच्चारण करत होता. होमाच्या धगीने त्याचं संपुर्ण शरीर लालबुंद होऊन घामान डबडबलं होतं आपले तीक्ष्ण डोळे त्याने वेताळावर रोखुन धरले होते. तर बाजुची भुतावळ आपल्या माना खाली घालुन एका विशष्ट लयीत  फेर घालत होती. प्रत्येक शब्दागणिक त्याच्या मंत्राची धार आता वाढु लागली होती. म्हणजेच त्याची पुजा आता उत्तरार्धाकडे पोहचली होती. समर वर्मा ने मंत्रोच्चारण करता करताच हाताने काहीतरी खुण केली. तस मंदीरातल्या सैनिकांनी भिवाला खांद्यावर उचलला आणि ते बाहेर घेऊन गेले. भिवा अजुनही बेशध्द अवस्थेत होता. पण जसा त्याला होमाजवळ नेला तस धगीमुळे तो जागा झाला. आणि बाजच द्रुश्य पाहुन त्याच उरल सुरल बळसुद्धा निघुन गेलं. त्याला राहुन राहुन त्याच्या पोटुश्या बायकोची आठवण येऊ लागली. पण आता समर्पण करण्याशिवाय काहिच पर्याय नव्हता. पहिला बळी बाहेर आणल्यामुळे सारी भुतावळ आनंदाने जल्लोष करु लागली डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम........... सैनिकांनी भिवाला दोरखंडातुन मुक्त केल आणि भाले रोखुन त्याला त्या रिंगणात बसवलं. मंत्राचा आवाज आता जोरात घुमु लागला होता.  पडलेला वारा पण आता काहीतरी अमानवीय पाहायला मिळणार म्हणुन घोंघावत वाहु लागला. वार्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अस्ताव्यस्त झालेल्या केसांप्रमाणे उडत होत्या. तर जंगलातुन प्राण्यांचे विव्हळने चालु झाले होते.

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

मी आत मध्ये शक्तीहीन अवस्थेत वेताळाच्या मुर्तीकडे पाहात होतो. आणि हळुच माझ लक्ष आरोही ने दिलेल्या अंगठीकडे गेलं आणि तिचे शब्द आठवले. मी  महतप्रयासाने माझे बांधलेले हात धोतराच्या पिरवटात लपवलेला माझा स्वीस नाईफ बाहेर काढला आणि दोन्ही हाताच्या पकडीत आडवा पकडुन दाताने खोलला मग पायात पकडुन आधी हाताची रशी खोलली मग पायाची. दोन्ही सैनिक मगाशीच भिवाला बाहेर घेऊन गेल्यामुळे आत कोणीच नव्हत. बाजुलाच भिवाच आवरण त्याला उचलताना त्यातील वजणामुळे खाली पडल होतं. आता माझ्या कानातही तोच मंत्र वाजु लागला होता. ज्या वेताळाच्या उपासनेसाठी हे सर्व चालल होतं त्याच वेताळाचा आशीर्वाद घेऊन मी रागातच त्या आवरणातल डुकराचं मुंडक बाहेर काढुन डाव्या हातात धरल तर उजव्या हातात ति कुपी पकडली. बाहेर पडलो तेव्हा समर वर्माने आपला अंगठा कापुन त्याच रक्त भिवाच्या कपाळाला लावल. तस त्या दोघांपैकी एकाने भिवाचे दोन्ही हात पकडुन त्याला वाकवल तर दुसर्या ने कमरेचा धारधार सुरा आपल्या हातात घेतला. आता मंत्राचे आवाज अजुन जोरात घुमु लागले होते.      
     
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम....... 

त्याच शेवटच वाक्य पुर्ण होणार इतक्यात मी जोरात आरोळी ठोकली. "तुला बळी हवाय ना हा घे बळी.............." मी हातातली कुपी जोरात त्या रिंगणात आपटली व हातातली अंगठी समोर रोखुन धरली. कुपी फुटल्यामुळे एक उग्रसा दर्प त्या वातावरणात पसरला त्या वासामुळे व अंगठीच्या सामर्थ्यांमुळे सारी पिशाच्चे शक्तिहीन झाल्याप्रमाणे वागु लागली तसा भिवा झटकन माझ्या बाजुला येऊन उभा राहिला. पंडीत उर्फ  समर वर्मा ना त्या वासाला घाबरत होता ना अंगठीला. तो त्याच्या धगधगत्या डोळ्यातुन अक्षरशः आग ओकत मंत्रोच्चारण करत होता. जणु त्याला हेच म्हणायच होत कि कोणीच माझ काहिच उखडु शकत नाही. मी जराही वेळ न दवडता एकदा मंदीरातील वेताळाकडे पाहिल आणि कुत्सित पणे हसून ते मुंडक होमात फेकलं तसा स्फोट व्हावा त्याप्रमाणे ज्वाला भडकल्या आणि आम्ही दोन-तीन फुट लांब पडलो. समर वर्मा तर गुर हंबरतात तसा ओरडु लागला आणि क्षणात वादळ याव त्याप्रमाळे वारा सुटला. धुळीचा जोरात लोट आला. बाजुला सर्व जग गोल गोल फिरतय अस वाटु लागल आणि मध्येच पंडीत पाच सहा फुट हवेत वर उडुन जोरात जमीनीवर त्याच रिंगणार आदळला. त्याचे शेवटचे शब्द आमच्या कानावर पडले "स्सोडणार नाही........................................!"
 
सप्पकन कोणीतरी पाण्याचा सपका तोंडावर मारला तशी जाग आली. डोळे उघडले तर ठाकरवाडीतली पोर आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. हातापायातल बळच गेल होतं त्यांनी आणलेल पाणी पिल्यानंतर थोडी तरतरी आली. भिवा आणि पंडीतची अवस्था पण काही वेगळी नव्हती. ठाकर वाडीत आल्यावर भिवाला पाहुन त्याच्या बायोकोच्या जिवात जीव आला. रडुन रडुन डोळे सुजले होते बिचारीचे. पंडीतचं सर्व अंग ठणकत होत त्याला रात्रीच काहीच आठवत नव्हतं आम्ही त्याला विचारल कि "तू तिथपर्यंत पोहचलास तरी कसा?" त्यावर त्याने सांगितल की, "मला तूच तर आवाज देऊन बोलावलस मग मी तुला शोधत आवाजाच्या दिशेने वाड्याच्या मागे गेलो तर तु मला पळत खाली जाताना दिसलास म्हणुन मी सुध्धा पळत तुझ्या मागे खाली आलो. तर तु पटकन काळोखात दिसेनासा झालास. तुला शोधत मी सुध्दा त्या काळोखात खाली उतरुन गेलो तेव्हा एका दालनात मला चमचमता प्रकाश दिसला, मी कुतुहलाने आत शिरलो तर समोर एका भव्य दिवानावर भरजरीत पोशाख ठेवला होता. त्याच्या बाजुलाच एक तलवार ठेवलेली आढळली. मी गंमत म्हणुन सहजच  त्या पोशाखातला मुकुट डोक्यावर घातला आणि ती तलवार उचलली तशी वीज सरकावी त्या प्रमाणे एक कळ माझ्या डोक्यातुन सर्व शरीरात भिनली त्यानंतरच मला काहीच आठवत नाहीये." सारी ठाकरवाडी तिथे आम्हाला बघायला लोटली होती. मग त्या पोरांनी आम्हाला सांगितल. रात्री कसे चित्र-विचित्र आवाज येत होते. मग सकाळीच ते आमच्या शोधात वर गेले तर वर फक्त् एक बिना मुंडक्याचा डुक्कर त्यांना दिसला आणि वाड्यात आमच्या बॅगा सापडल्या. मग कुणीतरी सुचवल कि रातच्याला येताळाच्या हितन कसल-कसल भयानक आवाज येत व्हतं तिकड धुंडुया. म्हणुन तुमची कापड आणि बॅगा घिऊन तिकड आलो तर ह्ये साहेब बिगर कपड्यात पडले होते, तर तुम्ही दोघे नुस्त्या धोतरावर बेसुद पडला व्हता. भिवाच्या घरी थोडी न्याहारी केल्यानंतर त्याचा निरोप घेऊन आम्ही तेथुन निघालो. निघताना बॅगेतले थोडे पैसे त्याच्या हातावर ठेवले तर पठ्ठया घेइना म्हटल, ठेव बाळंतपणात कामी येइल. तस त्याने साश्रु नयनांनी मिठी मारली आणि मलाही मग माझे अश्रु लपवला आले नाहीत. नाही म्हणता एका रात्रीत हा कोण कुठचा ठाकर पोरगा सख्या भावापेक्षा जवळचा झाला होता. त्याला लवकरच परत येइन म्हणत निरोप घेतला. एव्हाना आमची बातमी सार्या ठाकर वाडीत पसरली होती. सारी ठाकर वाडी आम्हाला निरोप द्यायला रस्त्यापर्यंत आली. भिवाचा बापपण त्यात होता. कालचा हाच विक्षिप्त म्हातारा आज मात्र समधानाने हात जोडुन उभा होता. पुंडलिकच्या दुकानापाशी गेलो तर दादोसा त्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन आमची वाट पाहात उभा होता. तिथे पुन्हा परत सर्व कथा कथन झाल्यानंतर आम्ही निघता निघता. त्या दोन सापळ्यांविषयी त्याला माहिती दिली. म्हटल पोलीसांना कळवा. जर ते त्याच फॉरेनर्सचे असतील तर त्यांच्या ऍंबेसीला तरी रीतसर कळवतील. जमल्यास पुरातत्व खात्याला पण कळवा, वर अशा भरपुर गोष्टी आहेत ज्या त्यांना संशोधनाच्या कामी येतील. मला आता कधी एकदा घरी जातोय अस झाल होतं. यावेळीही दादोसानेच त्याच्या फटफटीवरुन आम्हाला त्या फाट्यावर सोडलं आणि आमचा निरोप घेऊन निघुन गेला. पंडीत साहेबांच्या काहीच लक्षात नसल्यामुळे तो संमिश्र विचारात गुंग होता. पण माझ मन मात्र वर गडावरच अडकल होतं आरोही पाशी. ती डोक्यातुन जाता जाईना. काल सकाळी जाताना ज्या दिशादर्शकावर हार्ट मध्ये जे बी.ए. लिहल होत ते माझ्यासाठी होत वाटत. "भास्कर लव्ह्स आरोही" मी अनामिकेतील अंगठीचे चुंबन घेत पुटपुटलो माझ्या विचाराने मलाच हसु आलं. इतक्यात आमची एस.टी धुरळा उडवत आमच्या समोर येऊन उभी राहीली. आम्ही दोघेही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामळे काल पासुन बंद असलेले आमचे मोबाईल बाहेर काढुन त्यात गुंग झालो. मी सहज मेसेजेस चेक करत असतानाच आईचा कॉल आला गेली पंधरा मिनिटे मी फक्त हा..हु..हा..हुच करत होतो. आता तुम्हाला कळालच असेल ति काय बोलली असेल ते. फोन ठेवल्या ठेवल्या फेसबुकचा नोटीफिकेशन मेसेज आला. सहज चेक करायला गेलो तर डोळे मास्क मधल्या जिम कॅरी सारखे मोठ्ठे होऊन बाहेर येतायत का अस वाटल. मेसेज होता आरोही वर्मा सेंट यु अ फ्रेंन्ड रिक्वेस्ट. तर इकडे पंडीत कानाला इअर फोन लाऊन हसत ह्सत कसल्यातरी ओळी गुणगुणत होता.

 

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम....... 


समाप्त
मंत्र  संदर्भ  (शिव पुराण : वेताळ  उपासना )
वरील कथेतीलल सर्व व्यक्ती, घटना, स्थळ पुर्णपने  काल्पनिक असुन काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. 

शापित गड भाग 2


भिवा तिथुन जाताक्षणीच एक गुढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणारया गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकु येत होते. तिथुन पुढे.

पंडीत प्रश्नार्थक नजरेणे माझ्याकडे पाहात होता. मी काही बोलायच्या आतच तो बोलु लागला, "भास्क्या ह्या भिवाचं वागण मला काही ठिक वाटत नाहिये". असं का रे वाटतय तुला? मी विचारले. अरे तुला हा अनुभव आला की नाही ते माहीत नाही पण सबंध रस्ताभर मला अस वाटत होत की कोणीतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे. म्हणुन मी त्या अनुषंगाने एक दोनदा तुझ्याकडे बघितलसुद्धा पण तु मात्र तुझ्याच विश्वात रमला होतास. ह्या भिवा ला विचारल तर एकदम कुस्तित पणे हसुन बोलतो कसा आता भर दुपारी इथं कोण कशाला येतय मरायला.....! मला तर पंडीतच वाक्य ऐकुन कान गरम झाल्यासारखे वाटले. म्हणजे मला जे वाटत होतं तो भास नसुन खरच कोणीतरी आमच्या मागावर होत. आणि ते जे पण काही आहे ते आत्ता आमच्या आजुबाजुलाच आहे. कदाचित आत्ता या क्षणी ही ते आमच्यावर डोळे रोखुन पाहात असेल? माझ संपुर्ण अंग गार पडल्यासारख वाटल. तरीही उसनं अवसान आणुन मी पंडीतला विचारल. तु म्हणतोयस त्यात तथ्य आहे. भास तर मलाही झालेत इवन एक दोनदा मला चक्क कोणीतरी शुक्क शुक्क केल्याचा आवाज पण झाला. पण मला वाटल कि हा भास फक्त मला एकट्यालाच होतोय. म्हणुन मी तुला काहीच बोललो नाही. पण कदाचित आपण दोघेही प्रवासाने थकल्यामुळे आपल्याला खरच असे भास होत असतील.

माझ्या धीरोत्त शब्दांनी पंडीतच्या चेहरयावर थोड समाधान दिसलं. मग मीच पुढे विचारल पण "भावा तुला भिवा बद्दल अस वाटण्याच कारण काय? तसा पंडीत सुरु झाला बहुतेक त्याला याच प्रश्नाची अपेक्षा असावी. "सर्वात पहिल तो कोन दादोसा का फादोसा भेटला होता ना खाली, ज्याने आपल्याला काहीबाही गोष्टी सांगुन या भिवाच नाव सुचवल वर अजुन ते कोन सर्व्हे करण्यासाठी आलेले ते पण गायब झाले त्यांची कपडे आणि सामानपण म्हणे या भिवालाच सापडलं अस सांगितल. "तु तो भिवाचा बाप पाहिलास मगाशी? "तो जे हातवारे करुन सांगत होता ना" ते भिवाला नसुन कशावरुन आपल्यासाठी नसतील. आणि सर्वात महत्वाच म्हणजे आयला भर दिवसा इथे आपली फाटतेय इकडे यायला तिथे हा भिवा बिनधास्त उंडगतोय, आताचच घे हा कसला विचित्र आवाज आला तसा हा एकटाच पसार झाला. त्यात त्याचे पैसे पण तु मगाशीच देऊन मोकळा झालायस म्हणजे आता "तेल पण गेलय आणि तुप पण" आणि ह्यात जर ह्या दादोसा आणि भिवाचा काही कट असला तर बहुतेक आपल पण सामान ह्या भिवालाच सापडेल एक दोन दिवसांनी.

साल्या हे सगळ ना सावधान इंडीया आणि क्राईम पट्रोलचे परिणाम झालेत तुझ्यावर. आसलं काही एक होणार नाही आपल्याबरोबर आता इथेच शंकासुराचा जप करण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राजा भ्रमर वर्मा ला भेटुया मग तडक घरी. भिवा नसल्यामुळे माझ्या हातातील मॅपचा आधार घेत आम्ही पुढे चालत राहिलो. एक दहा पंधरा मिनिटांनी पुरुषभर ऊंचीच्या गवतातुन वाट काढत आम्ही त्या वाड्यापाशी येऊन पोचलो. पण तिथे गेल्यानंतर खरच समोर जे पाहील ते विस्मयकारक होते. गडावरील पाच तळ्यांपैकी जे शेवटचं तळ होत ते वाड्याच्या अगदी समोरच होते आणि पाणी तर एकदम स्वच्छ अगदी पहिल्या चार तळ्यांपेक्षाही. तळ्याचा आकार षटकोणी असुन त्याच्या मधोमध दगडाचा कसलातरी अर्धवट तुटलेला भग्नावषेश होता तो नक्की तिथे कशासाठी होता हे माहीत नाही. "वास्तविक एवढ्या वर्षांनंतरही जर गाळ वैगरे काढला नाही तर तळी हिरवीगार होऊन जातात". त्यावर कसल्या ना कसल्या शेवाळंचा तवंग वाढतो. पण त्याची बांधकाम शैली सोडली तर तळ्यातील पाण्याकडे पाहुन ते बाराशे वर्षांपुर्वीच असावे असा कुठलाच मागमुस दिसत नव्हता. तळ्याच्या मागच्याच बाजुला म्हणजे वाड्याच्या समोरच्या दिशेला एका छोट्याश्या उंचवटावजा जागेवर "ते" विचित्र झाड होतं. त्याच खोड पोकळ असुन व्यास आतमध्ये दोनतीन माणस सहज मावतील येवढा होता. पण फांद्या पर्ण हीन असुन एकदम लहान होत्या. त्याच्या एकंदर अवतारावरुन प्रत्येक पक्षाने त्या झाडाला वाळीत टाकले असावे असच दिसत होतं.

झाडाच्या दोन्हीबाजुंनी तळ्याकडे उतरणार्‍या दोन पाय वाटा होत्या. तर मेन पायवाट वाड्याच्या समोरच होती. जिथुन तळ्यात उतरण्यासाठी फरसबंदी पायर्‍या वर्तुळाकार करण्यात आल्या होत्या. वाड्याच्या आणि तळ्याच्या मध्ये वीस-पंचवीस फुटांचे अंतर असावे त्या जागेतही मधोमध कसला तरी शिलालेख सांकेतिक भाषेत कोरला होता. अर्थात आम्हाला तो काही वाचता येत नव्हता. पंडीत महाशय सभोवताली फिरुन आपल्याकडील डिजी कॅमचे फ्लॅश पाडत होते. साल्याला फोटोग्राफीचा भलता शौक घड्याळात आता दुपारचे तीन वाजले होते. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या आऊ साहेबांचा सकाळपासुन एकही कॉल नव्हता. ना व्हॉटस अप वर कुणाचा मेसेज मोबाईल बघण्यासाठी बाहेर काढला तर नेटवर्कच्या सारया कांड्या रोमिंग करायला गेलेल्या आढळल्या. म्हणजे आता घरी गेल्यावर आपली बिन पाण्याची होणार. पंडीतला तर काय टिळा लावुनच सोडलाय. मोबाईल परत बॅगेत टाकुन मी सहज पंडीतला विचारल "साहेब सकाळपासुन आपण जी फोटोग्राफी केलीय ती पाहण्यास मिळेल काय? अरे का नाही? बर झालस आठवण केलीस मी स्वताःपण नुसता क्लिक करत फिरतोय. बर झालस आठवण केलीस. आम्ही दोघे त्या शिलालेखाला टेकुन बसलो.

पठ्या ने काही काही इमेजेस अगदी अप्रतिम कैद केल्या होत्या. स्लाईड शो ऑन केल्यामुळे एक एक फोटो पुढे सरकत होता. भिवाच्या घरापर्यंत सर्व आलबेल होतं पण जसजसे तिथुन पुढेचे पिक्स येऊ लागले तसे आम्ही एकदम गपगार झालो. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे एक शांत कटाक्ष टाकला. कारण प्रत्येक फोटो मध्ये माझ्या मागे एक धुरकट पांढरया रंगाची आक्रुती दिसत होती. आणि अचानक गडाच्या प्रवेशद्वारा पासुन ती आक्रुती दिसण्याची बंद झाली. पंडीत जवळ जवळ ओरडलाच "बघीतलस भास्क्या", "मी बोलत होतो ना मगाशी. म्हणजे आपल्याला होणारे नक्कीच भास नसुन कसली तरी अमानवीय शक्ती आपला पाठलाग करत आहे. आणि त्या गावठी भिवाला हे सर्व माहीत असणार म्हणुनच तो गां--ला पाय लाऊन पळाला. आता आपल काही खर नाही. भेंच्...उगाच आलो इकडे. भास्क्या चल ऊठ आता बस झाल हे अडवेंचर. साला फोन पण डेड झालेत आपले. आणि अजुन थोडा वेळ गेलाना तर आपण पण डेड होऊ चल ऊठ लवकर. पंडीत गन चालल्यासारखा धडधडत होता.

"अरे शांत हो जरा हे बघ मी डिस्कव्हरी वर पाहिलय एखाद्या विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक प्रभाव जास्त असल्यामुळे असे विचित्र अनुभव येतात. त्यात तुझा कॅमेराचा फ्लॅश लाईट पण ऑण आहे अशावेळी जर फोटो काढताना काही हालचाल वैगरे झाली तर प्रकाशाच्या अपस्करणामुळे फोटोत असे टच अप दिसतात सो डोन्ट वरी भावा मी आहे ना. आणि प्रवेश दारा पासुन आत आल्यानंतरचे सर्व फोटो व्यवस्थित आहेत मिन्स नीड नॉट टु वरी ओके. माझ्या विज्ञाननिष्ठ उत्तराने त्याच काही समाधान झालेल दिसल नाही परंतु स्वारी तुर्तास तरी शांत झाली. पण मला पण आता खरंच आतुन भीती वाटायला लागली होती. आणि "माणसाच्या मनात एकदा का भितीचा प्रवेश झाला की स्वताची सावली पण त्याला घाबरवण्यास पुरेशी असते".

या सार्‍याचा परिणाम म्हणजे पंडीत आता त्या वाड्यात येणार नव्हता तो बाहेर बसुनच माझी वाट बघणार होता. पंडीत येणार नसल्यामुळे त्याचा कॅमेरा मी स्वताःकडे घेतला आणि माझ सर्व सामान त्याच्याजवळ ठेऊन मी त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश केल्या केल्या सभोवतालच्या वातावरणात एकदम गारवा जाणवु लागला. संपुर्ण वाडा काळ्या कातळाने बांधलेला होता आणि त्यासाठी लागणारे दगड बहुतेक समोरील तळ्याच्या खोदकामातुन काढले असावेत. वाड्यात जिथे मी उभा होतो त्या ठिकाणी एका वेळी शंभर माणसे आरामात उभी राहतील येवढी जागा होती. दोन्ही बाजुंना नक्षीदार खांब जे महिरपी कमाणींनी एकमेकांना जोडले होते. या सर्व खांबाच वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कसल्या ना कसल्या वाद्य वाजवणारया आणि काम करणार्‍या माणसांच्या, प्राण्यांच्या आक्रुत्या कोरल्या होत्या. बहुतेक हे सर्व खांब राज्यातील प्रजेचे प्रतिनिधित्व करत असावेत. त्याच्या मधुनच एक वाट सरळ जात होती जिथे आडव्या सज्जावरती मागे दोन आणि पुढे दोन असे एकुन चार कोरीव खांब होते आणि मधोमध बहुतेक राजाची बसण्याची व्यवस्था असावी. कारण त्याच्या बरोबर वर एक जबडा उघडलेल्या आयाळधारी सिंहाची प्रतीक्रुती दगडातच कोरली होती.

वाड्याच प्रवेश द्वार वगळुन दोन्ही बाजुला चार-चार असे एकुन नऊ दरवाजे होते.एकंदर आतील बांधकाम प्रशस्त असुन हवा खेळती रहाण्यास पुरेपुर वाव होता. राजाच्या सिंहासनाच्या समोरच म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर वर एक पंधरा वीस लोक बसु शकतील अशी माडी होती. बहुतेक राजाचा जनान खाना इथे बसत असावा जेणेकरुन दरबार भरला असताना फक्त राजाच तिकडे पाहु शकत असावा. त्या माडीच्या मधोमध एक गोलाक्रुती कवडसा अशा प्रकारे बसवण्यात आला होता जेणेकरुन सकाळी सुर्योदय झाल्यानंतर कोवळ्या किरणांची पहिली तिरीप बरोबर त्या आयाळधारी सिंहावर पडत असावी. मी कुठेतरी वाचल्याच मला आठवल की काही राजवंशा मध्ये सुर्याला फार मह्त्व दिलेल आहे आणि त्याचाच प्रभाव त्यांच्या स्थापत्य शैलीवरही आढळतो.
राजाच्या बसण्याच्या जागेच्या दोन्ही बाजुलाच दोन दरवाजे मागच्या भिंतीलाच समांतर न बांधता आतील बाजुस २०-२५ अंशात थोडे तिरपे बांधले होते जेणेकरुन एखादी व्यक्ती जरी तिथे उभी असेल तर मान वळवल्यानंतर फक्त राजालाच ती दिसु शकत असेल. अर्थात तिथपर्यंत जाण्याचा मान राजाच्या कुटुंबाव्यतीरिक्त फक्त त्याच्या मर्जीतल्या माणसांनाच असावा. तिथुनच दगडी पायरया गोलाकार वळुन वर गेल्या होत्या. बहुतेक तिथे राण्यांची दालणे असावीत व तिथुनच समोरील माडीपर्यंत जाण्याचा रस्ता असावा. थोडेफार फोटोशुट झाल्यानंतर मी डाव्या बाजुच्या दरवाजाने आत जाण्याचा जाण्याचा निर्णय घेतला. बहुतेक मी ज्या गुप्त दरवाजाच्या शोधात होतो तो तिथेच असावा. खरतर मला आत प्रवेश करण्यास जाम भिती वाटत होती. पण माझ्या मनातल कुतुहल मला स्वस्थ बसुन देत नव्हत. अखेर कुतुहलाने भितीवर विजय मिळवला. मी हातातला टॉर्च ऑन केला आणि हळु हळु पुढे पाऊले टाकु लागलो.

मी काही अंतर जातोय न जातोय तसा बाहेर तळ्यात धप्पकन काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला. आवाज येताक्षणी मी जोरात बाहेर धुम ठोकली कारण सर्वात पहिला जो विचार माझ्या मनात आला असेल तो म्हणजे पंडीतचा, स्वारी वाकुन बघायच्या नादात पडली बिडली तर नाही ना? बाहेर येताच माझ्या हातातला टॉर्च तसाच गळुन पडला व समोरील द्रुश्य पाहुन मला आता फक्त भोवळ यायचीच बाकी होती. कारण मगाशी ज्या तळ्यातल पाणी एकदम स्वछ होतं ते आता एकदम हिरवगार झांल होतं त्याच्यावर कसल्यातरी शेवाळाचा उग्र तवंग चढला होता. आणि विशेष म्हणजे तो दगडाचा भग्नावशेस पण त्याच्या जागेवर उभा नव्हता. संपुर्ण वातावरणात एक उग्रसा कुबट दर्प भरुन गेला होता. मी आजुबाजुला पाहील पण पंडीत कुठेच दिसत नव्हता. बर तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता. ना पाण्यात कसली हालचाल दिसत होती. सार काही एकदम गुढ. मी बेंभीच्या देठापासुन त्याला आवाज द्यायला लागलो. वाड्याच्या आजुबाजुला सैरभैर पळुन सर्वीकडे पाहिलं. जमेल त्या टेकडीवर चढलो. परत वाड्यात जाऊन पाहिल अगदी आजुबाजुंच्या तटबंदीवर चढुन कुठे काही दिसतय का याचा मागोवा घेतला पण त्याचा कुठेच मागमुस लागत नव्हता. पंडीत हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला होता. मी हताशपणे चालत तसाच तळ्यापर्यंत आलो. मगाशी हातातुन पडलेला टॉर्च तसाच चालु होता व त्याचा प्रकाश समोरील भिंतीवर पडला होता. मी तो ऊचलला आणि बंद करुन खिशात ठेवला.

आता माझ्या मनात भिती आणि काळजी अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. पंडीतच्या आठवणीने मन व्याकुळ होत होतं. साला उगाच इकडे आलो. माझ्यामुळेच बिचार्‍यावर आज ही वेळ आली. कुठे असेल तो? त्याच्या जिवाच काही बर वाईट तर झाल नसेर? माझ्या विचारांप्रमाणेच आजुबजुच वातावरण पण आता झटपट आपल रुप पालटत होतं. सुर्य अस्ताला जायच्या मार्गावर होता. आकाशात चारी बाजुंना गडद तांबड्या रंगाची झालर पसरली होती. मधुनच ऊंचावर पक्षांचा एक थवा घरट्याकडे परतत असताना दिसला आणि माझा बांध सुटला माझ्या डोळ्यात नकळत आसव जमा झाली. आज पहिल्यांदाच आईची खर्‍या अर्थाने आठवण येऊ लागली. मावशीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. जर पंडीतच काही बर वाईट झाल तर कोणत्या तोंडाने तिला सामोरा जाऊ? का माझ पण तेच होणार? नाही...नाही.., मी हे होऊ देणार नाही. माझ्या विचांराशीच माझी खलबतं चालु असताना समोरील बाजुस दुरवर गवतात कसली तरी सळसळ जाणवली. सभोवताली काळोख वाढल्यामुळे डोळे किलकिले करुन त्या दिशेने पाहीले असता कसली तरी आक्रुती वाड्याच्या दिशेने सरकताना माझ्या नजरेस पडली. घाबरुन मी माझा मोर्चा तळ्याच्या मागच्या झाडाकडे वळवला.

त्या ढोलीत लपुन मी बाहेरील आवाजाचा काणोसा घेऊ लागलो. बाहेरील सळसळीचा आवाज हळु हळु वाढत होता. कोण असेल? पंडीत तर नसेल ना? मला जोरात त्याला आवाज देऊसा वाटला. नाही. पण पंडीत असता तर एवढ्यात तिकडुणच बोंबलत आला असता. त्यात तो इतक्या लांब कशाला जाईल. मी झाडाला असलेल्या फटीतुन बाहेर काही दिसतोय का याचा मागोवा घेऊ लागलो इतक्यात हळुच कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला. तसा मी दचकुण मागे वळालो आणि पुर्ण ताकदिने त्या आक्रुतीला मागे ढकललं. तसा जोरात धप्प. असा आवाज आला. काहीसा कळवळतच तो ओरडला, “अहो काय करताय? “थांबा! मी भिवा मांग” लगेचचं मी खिशातला टॉर्च काढला आणि त्याच्या तोंडावर मारला. अचानक आलेल्या प्रकाशामुळे त्याने झटकन आपला हात टॉर्च समोर धरला. तो भिवा मांगच होता. त्याने घातलेला अंगरखा संपुर्ण रक्ताने माखला होता व मी मारलेल्या धक्क्यामुळे हातातला कोयता तसाच बाजुला पडला होता. त्या कोयत्यावरही रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. माझ्यातल्या संशयाची जागा आता खात्रीने घेतली. मी त्वेषाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या छातीवर बसलो. बाजुलाच पडलेला कोयता उचलुन त्याच्या गळ्याला लावला आणि जवळ जवळ ओरडतच त्याला विचारल. “साल्या काय केलस माझ्या भावाचं? का मारलास त्याला? “सांग नाहीतर इथेच गळा चिरीन. रागाने माझे हात थरथरत होते. माझ उग्र रुप पाहुन भिवा चांगलाच चरकला. “साहेब शांत व्हा. मी कशाला मारु तुमच्या भावाला. “गप्प बस बंद कर तुझ हे साळसुद पणाच नाटक खर-खर सांग तु का मारलस त्याला? कुठे आहे तो? आणि आता मला मारायला इथपर्यंत पोहचलास. “सांग लवकर का मारलसं, अरे आम्हाला मारुन अस काय मिळणार आहे तुला. “साहेब एक मिनिट ऐकुन तर घ्या माझ. “मी खरच न्हाय मारलं त्यास्नी. माझ्या बायकोच्या पोटातल्या पोराची शपथ आणि आजुनबी तुम्हासनी तसच वाटत आसलं तर खुशाल कोयता चालवा ह्या मानवर. त्याच्या ह्या वाक्याने माझ्या हातातला कोयता तसाच गळुन खाली पडला.

भिवा पुढे बोलु लागला. साहेब तुम्हासनी आठवतय दुपारी आपण वर आलो तवा कसला तरी आवाज आला व्हता. तो दुसरा कसला नसुन मी दोन दिसापुर्वी लावलेल्या सापळ्यात जनावर घावल व्हतं. आणि मी लगेच गेलो नसतो तर यावेळचं फास बी त्यान तोडुन टाकल असतं. आधीच लोकांच्या शेताची त्यानं चागलीच नासधुस केली हाय त्यामुळे ह्या येळला त्याला सोडुन चालल नसतं म्हणुन तिथच हाणल त्याला आणि धुड येवढ मोठ हाय की माझ्या एकट्याच्यान न्हाय हालायच म्हणुन तिथच फाडुन लपवुन ठेवलय म्हंजी सकाळी वाडीतली दोन तीन पोर आणुन खाली नेता येईल. माझा विश्वास बसावा म्हणुन भिवा मला फास लावलेल्या ठिकाणी घेऊन गेला. भिवाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच समोर एक डुक्कर मरुन पडला होता. त्याची मान कापुन भिवाने वर फांदीला अडकवुन ठेवली होती तर उर्वरीत धडाचे चारी पाय बांधुन त्यावर कपडा ठेवला होता. सायेब मी हित असलो तरी ह्या जागेवरन बाहेरच्या दरवाजाचा पर्यंतचा परीसर दिसतो. मला वाटलं तुम्ही याल तास दोन तासात तिथपर्यंत मग तुमच्या बरोबर मीबी निघालो असतो. पण भरपुर येळ झाला तरी तुम्ही दोघबी मला परत येताना दिसला न्हाईत. त्यात मगाशी तुम्ही ज्या हाका मारल्या त्यावरुन नक्किच काहीतरी गडबड असावी अस मला वाटल म्हणुन कोयता उचलला आणि वाड्यापाशी आलो तुम्हाला शोधत. आता मला माझ्या क्रुत्याचा पश्चाताप होऊ लागला. मी भिवाची माफी मागितली. पण आता प्रश्न हा होता की पंडीतच काय झाल असेल? माझ एक काम करशील? पंडीतचा शोध घेतल्याशिवाय मी गडाच्या खाली उतरणार नाही मग माझ्या जीवाच काहीपण होवो. मला मदत करशील? साहेब तुम्ही काळजी करु नका. जमल ते सर्व करायची माझी तयारी हाय. पण आज पित्री आमावस्या हाय त्यात त्या वाड्याबाबत कसल्या कसल्या वावटळी भी मी ऐकुन हाय. त्यामुळे रातच्याला इथ थांबुन वाट बघण म्हणजे साक्षात म्रुत्युला निमंत्रन देण्यासारखं आहे. साहेब सकाळी पंडीत साहेब बी मला त्यांना झालेल्या भासाबद्दल इचारत होते. पण म्हटल उगाच का घाबरवा म्हणुन मी उत्तर द्यायच टाळत होतो. पण खर सांगु आज माझ्या बाची जी परिस्थीती हाय ती या गडावरच्या वाईट शक्तींमुळच, मला पटकण दुपारी पाहिलेल्या फोटोंची आठवण झाली. नक्की हे काय गौड बंगाल आहे ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी आम्ही त्या झाडाच्या ढोलीत लपुन वाड्यात घडणार्या घटणांचा आढावा घ्यायचा ठरवलं. आमचा प्लान सिंपल होता पहाटे पर्यंत गडावर त्या ढोलीत थांबायच आणि उजाडल की पंडीतच्या शोधात निघायचं अर्थात हे आम्ही ठरवल होतं पण नक्की पुढे काय आणि कस घडणार हे येणारी रात्रच ठरवणार होती.

ढोलीत बसुन आम्हाला आता चांगले तीन एक तास होत आले होते. पण आजुबाजुला काहीच हालचाल दिसत नव्हती. भिवा तर बसल्या जागीच डुलक्या काढायला लागला होता. मध्येच मानेवर काहीतरी वळवळ झाल्याची जाणवली तस जोरात झटकल तर एक मोठी गोम सळसळत आमच्या पायातुन पुढे निघुन गेली. गोम पर्यंत ठिक होती पण एखादा साप- बिप आत घुसला तर पंचाईत व्हायची. नुस्त्या कल्पणेनेच अंगावर काटा आला. बाहेर फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता तर मध्येच एखादी माशी किंवा डास कानाजवळुन गेला की त्याच्या पंखाची भुनभुन ऐकायला येत होती. घड्याळात ११.४५ वाजले होते. अजुनही बाहेरची परिस्थिती जैसे थे. आता हा भ्रमर वर्मा वैगरे सर्व फक्त गोष्टीं मध्येच आहे की काय अस वाटायला लागल होतं. सकाळी फोटोंचा प्रसंग आणि पंडीत गायब होण्याचा प्रसंग सोडला तर सर्व काही आलबेल होतं. पंडीतच्या आठवणीने पुन्हा मन व्याकुळ होऊ लागलं. बरा तर असेल ना? की त्याच्या जीवाच काही बर वाईट? कुठे असेल? असा एखादा माणुस कसा काय गायब होऊ शकतो. खरच मोठ कोड आहे. मी विचारांमध्ये असतानाच बाहेर जोरात वारा सुरु झाला. घड्याळात बारा वाजले होते. आज पर्यंत गरजणारे चाळीस फक्त भुगोलाच्या पुस्तकातुनच माहीत होते. पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्या भितीदायक आवाजाने भिवा पण तरतरीत होऊन सावध झाला. आम्ही दोघेही सावध पवित्रा घेऊन बसलो. आणि थोड्याच वेळात तो वारयाचा आवाज बंद झाला तसा दुरुन घोड्याच्या टापांचा आवाज ऐकु येऊ लागला. हळु हळु तो आवाज मोठा मोठा होत एकदम शांत झाला. आणि ढोलीत मला प्रकाशाची एक तिरिप दिसु लागली. मला वाटल चुकुन खिशातला टॉर्च ऑन झाला कि काय? पण टॉर्च तर बंद होता. तस भिवाने थरथरतच मला फटीतुन बाहेर बघण्यास सांगितले. समोरचा वाडा संपुर्ण प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. आणि त्या वाड्याच्या प्रवेश द्वाराच्या मधोमध एक तरुन राजाच्या वेषात ऊभा होता. बहु तेक हाच तो भ्रम्रर वर्मा ज्याच्या आख्यायिका मी ऐकत होतो. दुरुन त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण हळु हळु तो तरुण वाड्या समोरील शिलालेखासमोर येऊन उभा राहीला आणि त्याणे राक्षसी हास्य करत त्या शिलालेखाला नमस्कार केला व एक संपुर्ण प्रदक्षिणा मारली आणि बाजुलाच उभ्या असलेल्या अरबी घोड्याच्या पाठीवर जोरात थाप मारली तस त्याच संपुर्ण अंग थरथरुन निघाल. त्याने घोड्यावर बसण्यासाठी बैठक मारली तशी आकाशात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात त्याचा संपुर्ण पेहराव आणि चेहरा झळाळुन निघाला. आणि जे पाहील ते पाहुन डोळे फक्त बाहेर यायचेच बाकी होते. कारण त्या पेहरावातला तरुण दुसरा तिसरा कोणी नसुन माझा मावस भाऊ सात्विक उर्फ पंडीत होता.

पंडीत ने घोड्याला टाच मारली तसा घोडा संथ चालीत वाड्याच्या उजव्या बाजुच्या वाटेने पुढे जाऊ लागला. घोडा जस जसा पुढे जात होता. तस तश्या बाजुच्या जीर्ण झालेल्या भिंती आत्ताच रंगरंगोटी केल्या प्रमाणे ऊजळुन निघत होत्या. तटबंदी व त्यावर जाणारया वाटाही आता पुर्ववत झाल्या होत्या. ठिकठिकाणी जळक्या मशाली प्रज्वलीत झाल्यामुळे वातावरणात हलकासा मंद प्रकाश सर्वदुर पसरला होता. पंडीतची घोड्यावर बसलेली आक्रुती हळु हळु आमच्या नजरेआड जाऊन दिसेनाशी झाली. त्या रुबाबदार पांढर्या पांढरया घोड्यामुळे व त्याला मॅचींग तश्याच वेषामुळे एक मोठा पांढरा ठिपका बारीक होत-होत नाहिसा झाल्याचा भास झाला. वातावरणात अचानक एक प्रकाराचा उत्साह संचारला होता. पण अर्थात तो मानवीय नव्हता. समोरील वाडा आतमध्ये दरबार भरल्याप्रमाणे एकदम उजळुन निघाला होता. तळ्यातही मधोमध मस्त कारंजे ऊडत होते. वातावरणात एक हलकासा सुगंध पसरला होता. तर वाड्याच्या दिशेने एक हलकस मंद संगीत ऐकायला येत होतं. सार वातावरण एकदम गुढ आणि विलक्षण वाटत होतं. काही वेळेसाठी हे स्वप्न तर नाही ना म्हणुन भिवाला हळुच चिमटा घ्यायला सांगितला. "ऑऊच अरे हळु रे", मी भिवाला ओरडलो. म्हणजे हे सर्व खरोखर घडत होतं. बस आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकरणाचा छडा लावूया असा विचार मनात आला. पण जशी वाड्याबाहेरील हालचालींवर नजर गेली तसं त्या ढोलीत शांत बसण्यातच शहाणपणा आहे याची जाणीव झाली. कारण त्या वाड्यासमोरच दोन काळे धिप्पाड सैनिक भाला घेऊन खुनशी नजरेणे पाहात ऊभे होते. लागोलाग भिवाने माझं लक्ष बाहेरील तटबंदीवर वेधले. "साहेब ते बघा वर पण असेच काळे टेणे गस्त घालतायतात. आता इथुन बाहेर पडलो किंवा त्यांना आपण इथे असल्याचा सुगावा लागला तर देव पण आपल्याला आज वाचवु शकणार नाही." म्हणजे आता आम्ही खर्या अर्थाने "त्यांच्या" तावडीत सापडलो होतो.

इतक्यात भिवा काकुळतीच्या स्वरात बोलला, "साहेब आपल्याला काही होणार तर नाही ना?" "माझी कारभारीन पोटुशी हाय." "ती काळजी करत आसलं." "माझ काय बर वाईट झाल तर?". भिती आमच्या दोघांच्याही चेहरयावर स्पष्ट दिसत होती. मी त्याला उसना धीर द्यायचा प्रयत्न केला. मलाही आता आई आणि अण्णांची तीव्र आठवण येत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता; तर बुद्धी हे सर्व मानण्यास तयार होत नव्हती. एक दोन मिनिटात माझ्या नजरेसमोरुन सकाळपासुनचा सर्व घटनाक्रम सरकून गेला. आमच हरवल गावापर्यंत येणं, रस्त्यात भेटलेला दादोसा, भिवाच्या घरी त्याचा विक्षिप्त बाप, आम्हाला झालेले भास, फोटोतल्या त्या आक्रुती, भितीदायक आणि तितकाच गुढ वाडा, त्याच्यासमोरच तळ, आम्ही आता ज्या ढोलीत बसलोय ते झाड, आधी भिवा व नंतर पंडीतच गायब होणं. त्यात हा भिवा बिचारा परत आला तरी पण हा पंडीत सरळ सरळ त्या राजाच्या वेषात तिथपर्यंत पोहचण हे आमच्यासाठी एक कोडच होतं. गडावरील वातावरण तर एखाद्या हॉरर मुव्हीच्या सेटप्रमाणे बदलत होतं.

पंडीतला तिथुन जाऊन दहा एक मिनिटे झाली होती, पण तिथुन बाहेर निघण्याच धाडस काही होईना. तेवढ्यात दुरवरुन कसलेसे अस्पष्ट आवाज येऊ लागले. अस वाटत होतं जणू कोणीतरी मंद लयीत नगारा बडवत एखाद्या सांकेतिक भाषेत कोणाला तरी साद घालत असावं. इतक्यात हुंकारे भरत पळण्याचा आवाज आमच्या कानावर पडला. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तो आवाज आमच्या दिशेनेच येत असल्याच आम्हाला जाणवलं. बस आता इथे थांबनं म्ह्णणजे साक्षात म्रुत्यूलाच निमंत्रण देण्यासारख होतं. "भिवा चल ऊठ इथुन! आत्ताच्या आत्ता आपल्याला ही जागा सोडायला हवी". आता तो आवाज हळु हळु मोठा होत असल्याचा आम्हाला जाणवलं म्हणजे कोणीतरी याच दिशेने येतयं. नुसत्या कल्पणेनेच पोटात भितीचा गोळा आला. मी आणि भिवा घाबरत घाबरत दबक्या पावलांनी त्या ढोलीच्या बाहेर आलो. कारण वाड्याबाहेरच्या किंवा माचीवरच्या त्या अमानवीय सैतांनाच जरा जरी लक्ष गेल तरी खेळ खल्लास. वाड्यासमोरचा परिसर जरी उजळला असला तरी या भागात अजुन अंधारच होता. अंधारात समोरील प्रत्येक आकार अंगावर येत होता. चारी बाजुंनी कस-कसले भीतीदायक आवाज आमचा पाठलाग करतायत अस वाटत होतं आणि सभोवतालचा परीसर ही जुना पडीक सकाळी होता तसाच दिसत होता. आता यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. भितीने भिवाने त्याच्या हातातील कोयता अजुन घट्ट पकडला होता आम्ही दोघेही समोरच्या गवतात शिरणार इतक्यात सहा-सात काळे कुळकुळीत माजलेले भोई खांद्यावर पालखी घेऊन हुंकारे भरत आमच्या दिशेने पळत येेताना आम्हाला दिसले. बस्स आम्ही जीव घेऊन तिथुन पळु लागलो. भिवा पुढे, मी मधे आणि काही अंतरावर ते दैत्य आणि त्यांच्या खांद्यावर "ती" पालखी. आता काही करुन यांच्या तावडीत सापडायचं नाही. पुरुषभर वाढलेल्या त्या गवतातून धावताना आमची चांगलीच दमछाक होत होती.

अंधारामुळे आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय काहीच कळत नव्हत. जस जसा आमचा वेग वाढत होता तस तसे तेही आणखीन जोरात हुंकारे भरत आमच्या मागे येऊ लागले. आता माझा श्वास चांगलाच फुलला होता. पायातल त्राणही संपत आलं होतं परंतु मन हार मारायला तयार नव्हत. अखेर पळता पळता भिवा अचानक एके ठिकाणी थांबला. तसा हातानेच मी त्याला पुढे जायला सांगु लागलो. पण तो जागचा हालला नाही. त्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलले होते. जसा मी त्याच्याजवळ पोहचलो तस मलाही सर्व संपल असच वाटल. समोर एका ऊंच कड्याच्या टोकाशी आम्ही उभे होतो. खाली खोल दरी आणि समोर ते अमानवीय भोई.
भरपुर धावल्यामुळे आमच संपुर्ण शरीर ओलचिंब झाल होतं. थोड्याच वेळात ते भोई आमच्या समोर येऊन उभे राहीले. मी मनातल्या मनात भीमरुपी बोलायला सुरवात केली. तर भिवाची पण परिस्तिथी काही वेगळी नव्हती. आमच्यात आणि त्यांच्यात आता फक्त काही फुटांच अंतर उरल होतं. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. एका क्षणात आयुष्याचा कोलाज माझ्या डोळ्यासमोरुन ओझरत निघुन गेला. दुरुन येणारे नगार्यांचे आवाज आता अजुन स्पष्ट एकायला येऊ लागले. इतक्यात समोरच्या पालखीतुन एक नाजुक हात बाहेर आला. व त्याने खुनेनेच पालखी खाली ठेवायला सांगितली. हळुच पालखीचा मखमली पडदा बाजूला झाला. आणि एक सौंदर्यवती त्यातुन बाहेर पडली. तिच्या बाहेर येताच त्या सर्वांनी आपल्या माना खाली वाकवल्या आणि सर्वजन यंत्र मानवाप्रमाने स्तब्ध झाले. साडे पाच फुटा पेक्षा जास्त उंची, कमनीय बांधा आणि एखाद्या राजकन्येला शोभतील असे राजेशाही कपडे. चेहरा तर असा गोंडस की कतरीना, करीनाला ओवाळुन टाकावं. आईशप्पथ लाईफध्ये पहिली वेळ एवढ सुंदर भुत बघत होतो. साला लोक उगाचच भुताच्या स्टोर्या बनवुन सांगतात. भिवा माझ्या मागच्या बाजुला मान खाली घालुन कान्या डोळ्याने तिला बघण्याचा प्रयत्न करत होता. पण भिती मुळे त्याच धाडस काही होईना. त्या आरसपाणी सौंदर्यासमोर खरच मन घायाळ झाल. पहिल्या नजरेतील प्रेम काय असत याची अनुभुती आली.
समोरुन मंजुळ आवाज कानावर आला. "घाबरु नका, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखते आणि मी तुम्हाला वाचवायलाच इथे आले आहे. तूमचा भाऊ पंडीत आता कुठे असेल हेही मला माहित आहे. पण मला तुमची मदत हवी आहे. या गडाला शाप मुक्त करण्यासाठी कारण आज जर का "तो" त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाला तर कदाचित तो एका नवीन पर्वाचा उदय असेल."

"आपण......कोणाविषयी बोलताय? आणि कशावरुन तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे. आम्ही का म्हणुन तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा". मी धीर एकवटुन बोललो. "हे बघा! आपल्याकडे फार कमी वेळ आहे. जर का तो त्या वेताळाच्या मंदिरापर्यंत पोहचला तर तुमच्या पैकी कोणीच वाचणार नाही. आणि मलाही त्याच गुलाम बनुन राहाव लागेल. तो सांगेल ते ऐकाव लागेल. आज एवढी वर्ष तो याच क्षणाची वाट पाहात होता. सर्व योग त्याच्या मनाप्रमाने जुळुन आलेत. त्याला हवा तसा नरदेह मिळालाय. नाही-नाही आपल्याला त्याच्या सिध्द्दी मध्ये विघ्न आणलंच पाहिजे".

"पण तुम्ही स्वत कोण आहात? आणि तो म्हणजे? तुम्ही राजा भ्रमर वर्मा बद्दल बोलताय का?". "ना..ही.......! ते माझे वडील नाहीत" ती जवळ जवळ ओरडलीच.
"म्हणजे....तुत... तुम्ही राजा भ्रमर वर्मा च्या कन्या आहात?"

"हो.. मी त्यांचीच ज्येष्ठ कन्या राजकुमारी आरोही आहे. आणि ज्यांना तुम्ही भ्रमर वर्मा समजताय ते माझे वडील नसुन त्यांचाच जुळा भाऊ आणि माझा काका समर वर्मा आहे. माझ्या वडीलांनी कठोर मेहनत आणि तपश्चर्येने वेताळाला प्रसन्न केल होतं आणि त्याच्या मुळे ते आपल्या प्रजेच शत्रु राज्यांपासुन संरक्षण करु शकत. ते कलासक्त होते. कित्येक कलाकारांना राजदरबारी त्यांनी अभय दिल होतं. व्यापार उदीमही त्यांच्या काळात भरभराटीस आला होता. प्रजेच्या सुखासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी होती आणि वेताळाच्या सिद्धी मुळे त्यांना ते सहज शक्यही होते. परंतु याच्या अगदी उलट माझा काका होता. त्याला त्याच वेताळाच्या मदतीने सर्व साम्राज्य हस्तगत करायच होतं. त्याला सर्व प्रदेशावर त्याची दहशत आणि अंकुश ठेवायचा होता. त्याचे हे मनसुबे ज्याक्षणी वडीलांच्या लक्षात आले त्याचक्षणी त्यांनी एक राजपत्रक काढुन राज्यातुन त्याची हकालपट्टी केली.
सर्व जनतेसमोर झालेल्या हकालपट्टीमुळे तो सुडाग्नीने पेटला होता. त्याचाच बदला म्हणुन अशाच एका स्रर्वपित्री अमावस्येला जेव्हा बाबा वेताळाची उपासना करत होते. तेव्हा याने त्यांचा पाठलाग करुन तो मंत्र मिळवला. या मंत्राची खासियत अशी आही की संपूर्ण विवस्त्र होऊन १०८ वेळा तो अखंड बोलावा लागतो आणि एकदा का शेवटचं उ्च्चारण झाल की मंत्र म्हणणारयाने स्वताला त्या अग्नी कुंडात झोकुन द्यायच. यामुळे वेताळाला नरबळी पण मिळायचा आणि वडीलांच्या उपासनेवर खुश होऊन त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अभय मिळायच. त्यानंतर जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा हा मंत्र बोलला की सर्व पित्र तुमच्या कामास हजर मग अगदी काही असुदे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याने मंत्रोच्चारण चालु असतानाच होमकुंडात जनावराची चरबी ओतली. ज्यामुळे ज्वालाग्नी भडकाला. आणि दचकल्यामुळे वडिलांच्या नामस्मरणात खंड पडला. बस्स त्याच क्षणी वेताळाचा कोप झाल्यामुळे वडिलांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आम्हा सर्वांना वाड्यातच नजर कैदेत ठेवण्यात आलं आणि हा स्वताः त्या गादीवर बसला. त्याने मंत्र तर मिळवला पण तो जरा किचकट असल्यामुळे त्यालाच समजेल अशा सांकेतिक भाषेत वाड्यासमोरील शिळेवर तो कोरुन घेतला. त्यानंतर सुरु झाल अत्याचाराच पर्व. त्याने सर्व प्रदेश काबीज करायला सुरवात केली. जनतेचे अतोनात हाल होऊ लागले. सर्व कलाकारांचा राजआश्रय काढुन घेण्यात आला. पुर्वी जी जनता आपलं आयुष्य सुद्धा आपल्या राजाला मिळो अशी प्रार्थना देवाजवळ करायची तीच जनता आता त्याच्या मरणाची वाट पाहु लागली. आम्ही नजर कैदेत असलो तरी लोकांना संशय येऊ नये म्हणुन राजदरबारात सर्वांसमोर आम्हाला नेहमीसारखीच वागणुक मिळत असे. फक्त कोणाला भेटण्याची परवानगी अजिबात नव्हती. त्याच कारणही त्याने तितक्याच हुशारीने राज्यात पसरवलं कि आपल्या राजमाता म्हणजे आमच्या आऊसाहेबांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांना अविरत विश्रांतीची गरज आहे. तो सर्वांच्या डोळ्यात धुळ फेकत असला तरी आमच्या प्रधानांच्या डोळ्यातुन यासर्व गोष्टी बरोबर टिपल्या होत्या कारण तेच आमच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते आणि आमच्या वडिलांनंतर राज्यातील जनता त्यांचाच शब्द वंद्य मानत असे. त्यांनीच आपल्या गुप्तहेरांमार्फत सर्व गोष्टींचा व्यवस्थित पाठपुरवठा करुन सर्व गोष्टी आमच्या पर्यंत नीट पोहचतील याची काळजी घेतली. आणि मग प्रधानांच्या मदतीने त्याचाच डाव मी त्याच्यावर उलटवला. ज्या पध्दतीने त्याने बाबांच्या पुजेत विघ्न आणलं त्याच मार्गाने आम्हीही त्याला जायबंदी केलं. परंतु मरता-मरता आक्रोशाने त्याने शाप दिला, "हे सर्व साम्राज्य मी मरताक्षणी नाश पावेल, राजकुमारी आरोही. माझ्याबरोबर तुही यापुढे या गडावर शापित बनुन राहशील आणि ज्या सर्वपित्री अमावस्येला मला एखादा नरदेह पुन्हा प्राप्त होईल त्या दिवशी मी वेताळाला परत प्रसन्न करुन या संपुर्ण साम्राज्यावर माझ राज्य आणेन. आणि पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे".

मी जितक्या आर्ततेने कानात प्राण आणुन तिची गोष्ट ऐकली होती. तितक्याच घायाळ नजरेने तिला न्याहाळत होतो. पण क्षणात स्वताला सावरुन मी तिला विचारले, "पण मी तर वाचल होत की राजा भ्रमर वर्माच्या तीस राण्या होत्या आणि त्यातल्या आठव्या राणीने सत्तेच्या हव्यासापायी राजाचा घात केला". मी माझ विकी पिडीयाच तुनतुन वाजवल.

"हो होत्या ना! पण त्या माझ्या वडिलांच्या नसुन माझ्या काकाच्या होत्या. त्यानेच आजुबाजुच्या राज्यातुन त्या हस्तगत केल्या होत्या. बाकी हे आठव्या राणीने घात केला वैगरे मीही पहिल्यांदाच ऐकतेय". आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडु लागला. म्हणजे मगाशी घोड्यावर पंडीत नसुन त्याच्या शरीरावर ताबा घेतलेला समर वर्मा होता. आणि तो आता नरबळी द्यायला चालला होता. माझी दातखिळिच बसली........मी डोक्याला हात लावुन खाली बसलो.

"तुम्ही काळजी करु नका! आज काही करुन आपण त्याला त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊन द्यायच नाही". तिने मला तिच्या नाजुक हातांनी हळुच वर ऊठवल. असं वाटत होतं जणु सर्व विश्व थांबलय आणि आम्ही दोघेच या प्लॅनेटवर जिवंत आहोत.





शापित गड भाग १

 
आज शुक्रवार असल्यामुळे कामं तशी कमीच होती. त्यात दुपारचा लंच आज जरा जास्तच हेवी झाल्यामुळे डोळ्यांवर पेंग येत होती. बॉसने आज ऑफ घेतल्यामुळे मीही रीलॅक्स होतो. आजुबाजुला पाहील तर सार ऑफिस आज रिकामी वाटत होतं. मार्केटिंगवाले केव्हाच पसार झाले होते. बाजुला परेराकडे पाहीले तर तोही फेसबुकवर ईमानेइतबारे लागला होता. मी सहजच त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो कोणत्यातरी ट्रेकचे फोटो शेअर करताना दिसला. मी न रहावुन विचारलेच,"अरे परेरा किधर गया था? वो भी ट्रेक के लिये साले ऑफिस की चार मंजीले चढते चढते तेरी फट जाती है. और ये पहाड तु खुद चढ गया? और बिच मे ही ये ट्रेक बिक का भुत कहा से सवार हो गया तेरे सिर पर. साले लास्ट टाईम जब हमारे ऑफिस की पिकनिक माथेरान जा रही थी तब तुनेही कहा था " क्या लोग पागल जैसे जंगलो मे भटकने जाते है. कुछ रिसॉर्ट विसॉर्ट की पिकनिक अरेंन्ज करो थोडी दारु शारु हो जाय तो पिकनिक का मजा है. ये क्या पहाड बिहाड चढना.

यावर परेराने लगेचच प्रतीक्रिया दिली, " अरे यार जाना तो मै भी नही चाहता था पर क्या करु गर्लफ्रेन्ड के ऑफिस का ग्रुप था. उपर से हमारी मॅडम ठान के बैठी तुम्हे आना ही पडेगा. मैने हर तरह से ना जाने के बहाने बनाये. लेकिन अंत मे मुझे जाना ही पडा. हा थोडी तकलीफ हुई चढते उतरते वक्त, पर एक अनोखा कॉन्फिडंस मिला, इन शॉर्ट आय रीअली इंन्जॉयड इट. वो एक दुसरे के साथ डिसीप्लीन मे चलना, कोई पिछे रह गया तो उसके लिये वेट करना, कठनाई वालो रास्तोपे एकदुसरे की मदद करना. और ये सब कश्मकश मे जब तुम चोटी पर पहुंच जाते हो तब एक अनोखा एहसास होने लगता है. कुछ ऐसा सुख मिलता है जो हम शब्दो मै बयान नही कर सकते.

मला काही क्षण आस्था चैनल समोर बसलो आहोत असं वाटु लागलं आणि समोरील व्यक्ती परेरा नसुन परम पुज्य परेराबापु बसले आहेत अस वाटु लागले.
परेरा पुढे बोलु लागला.  "i suggest, you should also plan for a trek, "i assure, it will give you a nice experiance & help you out, to come up with new traits & capabilities that hidden inside you.

मी सहज मस्करीतच परेराला बोलला. "तेरी गर्लफ्रेंन्ड सॉलीड है यार! "अच्छा हुआ उसने माऊंट एव्हरेस्ट का प्लान नही किया." "नही तो मजाक मजाक मे वो भी तु चढ जाता." "वो भी विदाउट ऑक्सीजन." आणि मीच स्वतः फिदीफिदी हसायला लागलो. यावर परेरा फक्त दोनच शब्द बोलला. "पी.जे."

साडे पाच वाजले तसे घाई घाईतच शट डाऊन केलं, बॅग उचलली आणि कलटी मारली. ऑटोने स्टेशन ला जाताना डोक्यात परेराचेच शब्द घोळत होते. मग विचार केला दोन दिवस सुट्टी आहे याव जाऊन कुठेतरी. नाहीतर पेपरमध्ये ट्रेकर्सच्या जाहीराती येत असतातच. जाउया एखाद्या ग्रुप बरोबर. त्यात एखादी मुलगी वैगरे असली तर तेवढाच टाईम पास. पुढे काही जमले तर दुग्धशर्करा योग. विचार करत करतच घरी पोहचलो. आई जेवणात गुंतली होती. तर अन्ना राज्याचा हाल हवाला घेण्यासाठी फेरफटका मारण्यास गेले होते. तसा रिटायरमेंटनंतरचा हा त्यांचा आवडता छंद होता. आईला चहा टाकण्यास सांगुन मी माझ्या रुम मध्ये गेलो आणि माझी जुनी डायरी शोधु लागलो. पण काही केल्या ती मिळेना. इतक्यात आई चहा घेऊन आत आली तेव्हा तिनेच विचारलं, "काय रे काय शोधतोयस? आल्या आल्या? "जरा फ्रेश वैगरे व्हायच तर बसला पसारा काढायला. आधी चहा घे तो म्हणत ती निघुन गेली. माझ काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. इतक्यात सोफ्याखालच्या जागेत मला ती अंग चोरुन बसलेली दिसली. मला जोरात "युरेका..."युरेका ओरडावेसे वाटले. पण मी भावनांना आवर घातला. हळुच तिला बाहेर काढले. जराशी धुळ बसली होती ती हातानेच झटकली. आणि पटापटा पाने चाळु लागलो. शेवटी एकदाचा नंबर भेटला. मला मगाशीच ट्रेन मध्ये आठवल होतं की गेल्यावर्षी मी पेपर मधुन एका ट्रेकर्स ग्रुपचा नंबर घेतला होता. पण त्याच्या दुसरयाच दिवशी माझी बाईक स्किड झाल्यामुळे मी ट्रेक ला जाऊ शकलो नव्हतो. त्यात मी एकुलता एक असल्यामुळे आईने धसकाच घेतला होता. त्यांमुळे खबरदारी म्हणुन मी यावेळी तिला काहीच सांगायच नाही असं ठरवले.

चहा पिताच मी डायरीच पान उघडलं आणि पटकन तो नंबर डायल केला परंतु ना रिंग वाजेना ना कसला आवाज. सुरवातीस वाटले बंद झाला असावा बहुतेक पण एक शेवटचा ट्राय करुया म्हणुन पुन्हा डायल केला यावेळेला मात्र समोरुन आवाज आला. ह्या नंबरवरील सेवा अस्थायी वेळेकरीता स्थगित करण्यात आलेली आहे. आता मात्र माझा मुड ऑफ झाला.

मी मोबाईल तसाच बेडवर फेकला आणि फ्रेश व्हायला निघुन गेलो. फ्रेश होता होताच डोक्यात पटकन काहीतरी क्लिक झालं आणि आपल्याला हे पहिलं का नाही सुचल म्हणुन स्वतालाच दोष दिला. मी ओल्या अंगानेच बाहेर आलो. आणि तडक बेडरुम मध्ये घुसलो. पटापट आवरा आवर केली आणि लॅपटॉप ऑन केला, डोंगल कनेक्ट केला आणि गुगल वर एक दिवसात करता येईल अशा ट्रेकची माहीती शोधु लागलो, गुगल नेही इमानेइतबारे बर्यापैकी नावे सुचवली पण त्या सर्वात एक नावं माझ्या डोळ्यासमोर ऊठुन दिसत होतं, "शापित गड" मी स्वताशीच तात्या विंचु सारख तोंड करुन ते नाव पुन्हा उच्चारल "शापित गड" आयला शापित गंधर्व ऐकला होता पण हे गड प्रकरण जरा ईंट्रेस्टींग वाटतय म्हणुन मी त्या लिंकवर क्लिक केलं नेट थोडा स्लो असल्यामुळे बहुतेक साईट ओपण व्हायला वेळ लागत होता. इतक्यात आईने जोरात आवाज दिला," अरे भास्करा केस तरी कोरडे कर आधी, पाणी डोक्यात मुरल तर सर्दी व्हायची लगेच. मी न रहावुन सार्‍या रुमभर नजर फिरवली मनात आलं हीने बिग बॉस सारखे कॅमेरे तर नाही ना बसवलेत माझ्या रुम मध्ये? मला ति काढा घेऊन यायच्या आत टॉवेल घेणं जास्त पर्याप्त वाटलं. मी केस कोरडे करे पर्यंत शापित गडाचा विकीपिडीया समोर खुणावत होतां. वरतीच गडाचा ईतिहास दिला होता तो पुढील प्रमाणे.

हा गड इसवी सन पुर्व १२०० पुर्वीचा असुन याचे काम राजा भ्रमर वर्मा याच्या कारकिर्दीत पुर्ण झाले. तो वेताळाचा मोठा ऊपासक होता. त्याच्या दरबारी नाना प्रकारचे अवलिये होते. त्याने उभ्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही त्याचं कारण नही तसच रंजक आहे वेताळाला प्रसन्न करुन त्याने पिशाच्यांना आपल्या वश मध्ये केलं होतं आणि ही पिशाच्च राजा साठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतं याचच कारण म्हणजे राजा अजात शत्रु झाला होतां त्याला कोणाचच भय उरल नव्हत. आणि ज्यांनी त्याच्या सिंहासनाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वंशासहीत राजाने त्यांना संपवुन टाकलं.राजा पिशाच्चांना प्रसन्न करण्यासाठी दर पित्री आमावस्येला जंगालात निघुन जाई आणि पुर्ण नग्न होऊन वेताळाची उपासना करुन होमकुंडात स्वताला झोकुन देई. त्यामुळे वेताळ त्याला प्रसन्न होऊन सामर्थ्य पुरवत असे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याच्या आठव्या राणीने, (राजाच्या जनान खान्यात तीस राण्या होत्या) एका अमावस्येला त्याच्या पुजेत विघ्न आले परिणामी राजा होम कुंडात होरपळुन मेला, पण मरता मरता त्याने आक्रोशाने शाप दिला की ज्या साम्राज्यासाठी तुम्ही हे सर्व केलंत ते तुम्हाला कधीच उपभोगु देणार नाही..............! काळाच्या ओघात सर्व गेलं पण राजा भ्रम्रर वर्मा आजही त्या गडावर वास्तव्य करुन आहे पिशाच्च बनुन.मला थोड्यावेळासाठी मी चांदोबा वाचतोय असं वाटुन गेलं.

गडाच्या पायथ्याशीच एक हरवलं गाव आहे. आयला गावाच नाव पण काय तर हरवलं गावं म्हणजे सापडायची पंचाईत मी स्वताःशीच हसत बोललो. गडावर जायला दोन वाटा आहेत. एक गावातुन जाते तर दुसरी गावाला वळसा मारुन मागच्या जंगलातुन जाते. ते कुप्रसिध्द मंदीरही त्याच वाटेवर आहे.गडावर सध्या बघण्यासाठी राजाच्या वाड्याचे अवषेश पाच पाण्याची तळी आणी उध्वस्त झालेले बुरुज आहेत. आणि एक गुप्त दरवाजा जो राज्याच्या वाड्यातुन सरळ त्या वेताळाच्या मंदीरापाशी निघतो. मला एकंदर हे सगळ प्रकरण गंमतशीर वाटायला लागलं. मी तिथे जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती माहीती लिहुन घेतली. हरवलं गावाला जाण्यासाठी सरळ कोणतीही बस सेवा नाहीये. तुम्हाला खापरवाडीला जाणारी गाडी पकडावी लागेल. जी तुम्हाला हरवलं फाट्यावर सोडेल तिथुन तुम्ही गावात पाच कि.मी. आत पायी जाऊ शकता अथवा गावातल एखाद स्थानिक वाहन मिळु शकेल. आनि खापरवाडीला सकाळी आणि संध्याकाळी दोनच एसटी जातात व तिथेच अर्धा तास थांबुन परत फिरतात. त्यामुळे संध्याकाळची एस.टी जर चुकली तर दुसर्‍या दिवशी सकाळीच यावं लागेल. गडाच्या पसार्‍याचा मला स्वतालाच समजेल असा मॅप काढला आणि शट डाउन केलं. एव्हाना घडाळ्यात १० वाजले होते. टि.व्ही. वरच्या "आजचा सवालाच्या आवाजामुळे" अण्णा घरी आल्याची वर्दी मिळाली होती. एवढ्यात मातोश्रींनी जेवणाची पानं हॉलमध्ये मांडली. जेवताना सुध्द्दा वर्माचा भुंगा काय डोक्यातुन जात नव्हता. तसा आजच्या विज्ञाननिष्ठ युगात असल्या अमानवीय गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे जरा अतीच, परंतु विश्वास पानीपतात मेल्यामुळे नवीन विश्वास ठेवण्यास हरकत नाही, मी मनाशीच आयला आजकाल मी जास्तच पीजे मारायला शिकलोय, साला परेरा बरोबर बोलला दुपारी म्हणत ताटावरुन उठलो. जेवताना आई मात्र संशयित नजरेणे माझ्याकडे पाहात होती. तिला एव्हाना कल्पणा आली होती की बेणं नक्कीच काहीतरी उपदव्याप करायला निघाल असणार तर अण्णा मात्र पुढचा सवाल त्यांनाच विचारणार आहेत या पावित्र्यात बसले होते. मी पटकण ताट उचललं आणि बेसिनकडे धावलो. हात धुतला आणि आईच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी तोंडात मुठभर "बडी" सौफ कोंबली आणि तसाच बेडरुमकडे वळलो.आत गेल्या गेल्या पहिला मामे भाऊ कम मित्र ज्यादा सात्विक उर्फ पंडीतला फोन लावला. सात्विकला पंडीत हे नाव देण्यामागे काही विषेश कारण नाही. लहाणपणी त्याने शाळेतल्या नाटकात भटाचा रोल केला होता. तेव्हा पासुन आम्ही त्याला पंडीत याच नावाने संबोधतो.

"हॅलो...., "हॅलो........., पंडीत.. हा भास्क्या बोल," बोल काय ऐक आता! "तु तुझी कपड्यांची बॅग भरुन तयार रहा. उद्या पहाटे आपण निघतोय! "अरे पण कुठे? इति पंडित. ते तुला काय करायचयं? दादा बोलला ना मग नो प्रश्न नो उत्तर ओके. जशी आपली आज्ञा पण घरी काय सांगु? अरे सांग ना भास्कर बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय आणि मी घरी सांगतो मी सात्विक बरोबर चाललोय म्हणुन मी म्हणालो. अरे पण खोट का सांगतोय आपण? पंडीत कळकळीने बोलला. अरे आता खरंखरं सागितल तर आईच्या सतराशे साठ प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील. तिला वाटतं कि तिचा लेक अजुनही शाळेत जाणारा छबडुच आहे. अजुनही मी ऑफिसला जायला निघालो की, बबडी पास घेतलास? बबडी बाईकची चावी घेतलीस? बबडी बॅगेत एक्ट्रा बिस्कीटं ठेवलीयेत वेळ काढुन खा जरा तब्येत बघ कशी रोडावत चाल्ली आहे ते. हे रोज- रोज ऐकुन शेजारच्या जाधव काकुंच्या पोरी हल्ली माझ्याकडे बघुन फिसफिस करतात नुसत्या असो.... तु तयार रहा, सकाळी ठिक पाच वाजता एस.टी. डेपोत भेट आणि प्लीज लेट करु नकोस. त्याने ओके बॉस म्हणुन फोन ठेवला. स्वारी उंडगायचं म्ह्टल की एकदम खुश. तसे आम्ही लहान पणापासुन एकत्र भरपुर फिरलेलो अगदी शाळेच्या सहली पासुन ते गावच्या यात्रे पर्यंत, भांडलो ही तितकेच पण त्या भांडणातही प्रेम होतं. मी हळुच बेडरुमच्या दरवाजा पर्यंत गेलो. आई किचन मधला पसारा काढत होती तर अण्णा सेट मॅक्स वर "आखरी बदला" बगत बसले होते. मी मुद्दाम एकदिवशी अण्णांना विचारलं होतं अण्णा हा पिच्चर याच चॅनेल वर हफ्त्यातुन एकदा तरी लागतोच आणि तुह्मी ही तो न चुकता बगता. नक्की चॅनेल प्रेक्षकांवर बदला घेतय की एक प्रेक्षक म्हणुन तुम्ही आमच्यावर बदला घेताय. मला अण्णांना " अखेर चॅनेल बदला " असं ओरडुन सांगावस वाटत होतं पणं अर्थात मी ते टाळलं. मी हळुच आईजवळ गेलो आणि तिला सांगितल की मी सात्विक बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय इथेच जवळ आहे चार पाच तासाच्या अंतरावर रात्री किंवा परवा सकाळी येइन. हातातलं ग्लास तिने समोरच्या शेल्फ वर ठेवत आधी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि नंतर म्हणाली, "अरे पण दोन दिवस सुट्टी आहे तर आराम करायचा कशाला उगाच ऊना तान्हात भटकता. त्यात बाईक नेत असशील तर जायाचं नाही. गेले सहा महीने झाले चांगला फोटो काढं म्हणुन मागे लागली आहे, लग्नासाठी स्थळ येताएत, परवाच साठे काकु त्यांच्या गौरी साठी विचारत होत्या? पण ऐकशील तर तु भास्कर कसला? हा एक गुण मात्र तु आपल्या बापाकडुन आयता उचलायस आई अण्णांना ऐकु जाईल अश्या आवाजात बोलली. आई हे बघ मी उद्या चाललोय तेही ए.सटीने, पण परवा आलो की मी नक्की तुला आवडेल त्या पोझ मध्ये फोटो काढेनं प्रॉमीस. सोशल साईटस आणि स्मार्ट फोनच्या जमान्यात या माऊलीची मी फोटो काढुन घेण्यासाठी चाललेली तगमग पाहुन तिच्या भाबड्या प्रेमाचे कौतुक वाटलं. मी तडक तिथुन माझ्या रुममध्ये आलो. हळुच दरवाजा लावला आणि बॅग आवरायला घेतली. मॅन वर्सेस वाईल्ड मधल्या बिअर ग्रिल चा माझ्यावर विषेश प्रभाव असल्यामुळे मी त्याचासारखेच कपडे, शुज, टॉर्च आणि चाकु ऑनलाईन खरेदी केला होता. कपडे घालण्यासाठी हुकस्टॅंड ला अडकवले तर पाण्याची बाटली व ईतर साहीत्य बॅग मध्ये भरलं. आता झोप काही येत नव्हती म्हणुन मी तसाच गादीवर आडवा झालो. इतक्यात पंडीतचा व्हॉट्स ऍप वर मेसेज आला. गुड नाईट स्लीप टाईट, डेपोत भेटु ऑल राईट. मी उग्र स्माईली बरोबर एक ठोसा पाठवुन त्याला झोपवला. आणि भ्रमर वर्मा चा विचार करत स्वताही झोपी गेलो.

सकाळ असल्यामुळे स्टॅंडवर जरा कमीच गर्दी होती. डेपोत मिळुन चार पाच गाड्या उभ्या होत्या त्यातल्या तीन साध्या लाल डब्बा तर एक एशियाड बस होती. डेपोच्या डाव्या बाजुलाच फलाट नं एक व दोन ला लागुनच एक भली मोठी मुतारी आहे तर फलाट क्र. तेरा ला लागुन असलेल्या टी स्टॉल वरुन छान ऊकळत्या चहाचा सुगंध येत होता. काही लोक वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन "चाय पे चर्चा" झाडत होते तर खाकी वर्दीतल्या चालक आणि वाहकांची नियंत्रन कक्षात लगबग चालु होती. बाजुच्याच बाकड्यावर एक भिकारी हात पाय टाकुन अस्ताव्यस्त पसरला होता. तर त्याच्याच बाजुला एक अर्धा सफेद अर्धा राखाडी रंगाचा कुत्रा जीभ बाहेर व पुढचे पाय ताठ ठेऊन मागच्या पायावर शेपटी हालवत बसला होता. स्टॅंडच्या मधोमध एक पेपरवाला पेपरचे गठ्ठे सोडवुन व्यवस्थित लावत होता. इतक्यात गाडी नंबर एम एच ०४- ८०८५ मुंबई सेंन्ट्रल ते सातारा व्हाया मेगा हायवे फलाट क्र. ३ वरुन निघत आहे अशी घोषना झाली. तशी त्या गाडीच्या कंडक्टर ने जोरात शिटी मारली. गाडी सुटेल या भितीने एक दोघे प्रवासी बाजुच्याच शौचालयातुन चैन लावत पळतच बाहेर आले व त्यांनी चालकाला हात दाखवत गाडीत उड्या टाकल्या तसा कंडक्टर ने गाडीचा दरवाजा धाडकनं आदळून घेतला. गाडी धुरळा उडवत समोरच्या गेटमधुन डेपोच्या बाहेर पडली. पंडीत अजुनही आला नव्हता. साल्याचा फोन सुद्धा लागेना. इतक्यात मागुन भास्क्या ए भास्कर...असा आवाज देत तोच माझ्या जवळ आला. कुठे होतास रे इतका वेळ मी विचारलं. यावर तो म्हणाला मी वेळेवरच आलोय फक्त मागच्या गेटवर ऊभा होतो...............


"ठिक आहे चल आता आपल्याला लवकर निघाल पाहिजे," एव्हाना साडेपाच वाजले होते. मी आणि पंडीत चौकशी कक्षा समोर गेलो आणि खापरवाडीला जाणारया एस. टी ची विचारणा केली असता. गाडी फलाट नंबर अकरा वर लागेल असं सागण्यात आलं आम्ही तडक आमचा मोर्चा तिकडे वळवला. एव्हाना गाडी तिथे येऊन रिव्हर्स गिअर मध्ये फलाटावर लागत होती. गाडीच्या एकंदर अवतारावरुन ही पोचणार की पोचवणार अशा व्दिधा मनस्थीतीत मी अडकलो होतो.

पुढच्या चारच तासात आम्ही हरवल गावाच्या फाट्यावर "जिवंत" उभे होतो. एक दोन आचके तर एवढे जोरात बसले होते की आता आपले विस्कटलेले अवयव बहुतेक गोळा करुनच न्यावे लागणार असं वाटुन गेलं, मनात आलं हा जो कोणी ड्राईव्हर होता त्याला एस.टी महामंडळाने जर फॉर्म्युला वन मध्ये उतरवला तर "वेटल आणि शुमाकर" वर एस.टी चालवयची पाळी यायची. घड्याळात सळाळचे साडे नऊ वाजले होते. आम्ही जेथे उतरलो तिथे तीन रस्ते एकत्र आले होते त्यापैकी एक सरळ खापरवाडीला तर एक त्याच्याच बाजुने नागमोडी वळन घेऊन पुढे गेला होता. तर उजव्या बाजुचा काळवंडलेला बोर्ड आमचं लक्ष वेधुन घेत होता. शापित गडाच्या दिशेने दिशा दर्शक बाण दाखवला होता त्या बाणाच्या मध्येच कोणी तरी ह्रुदय काढुन वर ईंग्रजी बी आणि खाली ए लिहील होतं.च्यायला कोणाची क्रिएटिवीटी कुठे फळफळेल आणि एखाद्याच्या प्रेमाला कुठे पुर येईल सांगणे कठीण. मी पंडीतकडे नजर मारली स्वारीच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह आणि पोटात कावळे ओरडत असावेत असा मी अंदाज बांधला आणि मी काही बोलायच्या आतच, " ए भास्क्या दोन घास खाल्याशिवाय मजा नाही लेका तुझा माऊंट शापित चढायला इति पंडीत, "थांब रे हरवल गाव येईलच ईतक्यात मग खाऊ काहीतरी मी म्हणालो".
घड्याळात एव्हाना पाउने दहा वाजत आले होते. गेल्या पंधरा मिनिटांच्या चालीत ना एखादं वाहन ना एखादी व्यक्ती आमच्या नजरेस पडली होती. रस्ता म्हणजे तशी कच्ची सडकच होती लाल मातीची. दुतर्फा झाडं आणि किर्रर्र शांतता आमची पायपीट चालु असतानाच मागुन एक फटफटी कर्कश आवाज करत आमच्या पर्यंत आली, "काय रे ए पोरहो कुणीकड चाल्ला? पांढरा सदरा लेंगा आणि त्यावर तशीच मॅचिंग गांधी टोपी घातलेला माणुस आमच्याकडे रोखुन बोलला. वर्ण काळा असला तरी चेहरा तरतरीत मिश्या पिळलेल्या आणि कपाळावर गुलालाची रेघ एकुन व्यक्तीमत्व एकदम ठसठशीत त्यात बुलेट ही तशीच, हेडलाईटवर रेडियम मे काढलेले डोळे दोन्ही हॅंडलला लावलेले झुबकेदार झालर आणि मागच्या मडगार्डला लावलेल्या काळ्या रब्बरवर राम राम पाव्हनं असं ठळक अक्षरात लिहंल होतं. एकदंर ती बुलेट त्या माणसाला जास्त शोभुन दिसत होती.

"गाववाले जरा हरवलं गावाकडे चाल्लो होतो सोडाल कायं? "मी विचारल, "अहो त्यात इच्यारायचं काय, बसा ना मागं. गडावर चाल्लाय व्हय? इति मि. फटफटी. आम्ही एकसुरात होय म्हटलं, आणि पाठीवरच्या बॅगा सावरत त्यांच्या मागे बसलो. मध्ये पंडीत आणि मागे मी. एव्हाना त्यांनीच बोलायला सुरवात केली, "चांगला योग काढलाय म्हणायचा तुम्ही, कसला योग? इति पंडीत. म्हणजे काय आहे आज? "आव आजच तर पित्री आमावस्या आहे. आचच्याच दिशी त्या राजानं येताळाला प्रसन्न केलं होतं. आंम्ही कोन वर गडावर न्हाय जात पण गावच्या येशीवरच्या मंदीरातच त्याची पुजा करतो. असं म्हणतात रातच्याला एका ठराविक येळी गडावर कसल्यातरी शक्तींचा वावर असतोय, आमच्या गावचा भगत सांगतोय बगा, आता त्या चांगल्या हायती कि वाईट ह्ये तो वेताळच जाणो. बाकी तसल काय बी भ्या वाटायच कारण न्हाय फकस्त सांजच्याला येळवर खाली उतरा म्हणजी झालं. नाहीतर गेल्या येळला अशीच बाहीरच्या देशातन दोन माणस आली व्हती, काय ते सर्वे का काय म्हणत्यात तो कराया पण वर गेली ते पुन्यांदा काय खाली आलीच न्हाईत. कुणी म्हणत त्या रात्री गडावरणं कसले-कसले भयंकर आवाज येत व्हते, म्हणुन ते घाबरुन पळाले असतील. आमच्या ठाकर वाडीतला भिवा डुकराचे फासे लावायला वर डोंगरात गेला असता त्याला त्यांच समद सामान मिळाल. त्यानंतर पण अदनं-मदनं तुमच्यासारखी तरणीबांड पोर येत असत्यातच. ह्ये रानोमाळ नि फुटकं अवषेश धुंडाळुन त्यास्नी काय मिळत ह्ये त्यासनीच ठाऊक. त्याच्या ह्या बडबडीत आम्ही गावाच्या आत एका टपरीवर येऊन पोचलो. तिथे पोचताच आम्ही त्याच्या बुलेटवरुन पायऊतार झालो व तिथपर्यंत सोडल्याबद्दल त्याचे आभार मानले तसे त्याने कसल्यातरी पक्षाचे एक कार्ड आमच्यापुढे केले त्याचावर लिहले होते "दादोसा पाटील" शाखा अध्यक्ष- हरवल गावं. आम्ही ते कार्ड हातात घेताच त्याने टपरीवरच्या पोर्याला आवाज दिला, "पुंडलिक.. ए..पुंडलिक...! "पावण्यासनी फक्कड च्या आणि नाष्टा दे बघु आणि हो तुमच खाऊन झालं की टपरीच्या मागुन वरच्या अंगाला सरळ बाहेर पडलात की गडाची पायवाट लागते त्याच वाटेवर ठाकरवाडी बी हाय. तिथ गेलात तर मगाशी मी जे नाव सांगितल ना भिवा म्हणुन त्याच घर ईचारा पोरगं शे-दोनधे घील पण तुमासनी गडावर यवस्थीत पोचवलं. एवढ बोलुन त्याने बुलेट ला किक मारली त्याची गाडी पण त्याच्या सारखीच फट..फट..फट..फट..फट..फट करीत डोळ्यासमोरुन नाहीशी झाली.

टपरी तशी साधीच होती. टपरीच्या बाहेरच दोन लाकडी बाक आडवे मांडले होते तर समोरच्या आडव्या फळीवरच काचेच्या भरण्या वेगवेगळे जिन्नस भरुन ओळीत मांड्ल्या होत्या. त्यांच्या पत्र्याच्या झाकणांवरुनच त्या किती जुन्या आहेत याची साक्ष मिळत होती. टपरीच्या मागेच वडाचं विस्तीर्ण झाड त्याच्या पारंब्या सांभाळत डौलात उभे होते. त्याच्या भोवतीच गावातली काही जुनी खोड तंबाखु मळत बार भरत होती. आजुबाजुलाच कौलारु घरे दाटीवाटीने एकमेकांना खेटुन उभी होती तर काही कौलांवर डिश टिव्हींच्या छत्र्या मशरुम सारख्या डोक वर काढुन बघत असल्याचा भास होत होता. माझ निरिक्षण चालु असतानाच पुंडलिक गरमागरम मिसळ घेऊन आला. मटकीचा तांबडा रस्सा त्यात खरबुडी चिवडा आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि सोबतीला लिंबु. अशा एखाद्दा टपरीवर अस्सल गावरान चव चाखायला मिळेल अस आम्हा दोघांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुढची दहा मिनिटे आम्ही हा..हुं.. करत नाकाच पानी पुसत पुंडलिकाच्या मिसळीत पार बुडुन गेलो होतो.
मगाशी दादोसा ने सांगितल्या प्रमाणे आम्ही गाईड घ्यायचा ठरवला. शेदोनशे साठी कशाला उगाच रिस्क घ्या. त्यात गडाविषयी एवढ्या आख्यायिका ऐकल्या नंतर नाही म्हटल तरी आमची जरा पाचावर धारण बसली होतीच. पंडीत तर परत जाण्याच्याच मुड मध्ये दिसत होता. टपरीच्या मागच्या बाजुने सरळ चालत आम्ही गावापासुन थोडे पुढे आलो. मधेच चार- पाच पोर रबरी टायरला लाकडाच्या दांड्याने फटके मारत आमच्याकडे बघत निघुन गेली. तर आमच्या उजव्या बाजुनेच पाच-सहा म्हशी गळ्यातल्या घंटा वाजवत शहाण्या बाळासारख्या एका ओळीने विरुध्द दिशेने चालल्या होत्या. त्यांनी टाकलेल्या शेणांचे डोंगर चुकवत-चुकवत आम्ही ठाकर वाडीत येऊन पोचलो. ठाकर वाडी गावापासुन वर थोड्या ऊंचावर डोंगरातल्याच एका टेकडीवर वसलेली होती. मिळुन दहा-बाराच झोपड्या असतील. शेणाने-मातीने सारवलेल्या भिंती आणि वर गवताची झापं.

भिवाचं घर म्हणजे खोपट वजा झोपडीच होती. बाहेरच कोणी तरी म्हातारा माणुस ओल्या बांबुची चिपाड सोलुन टोपली वळत बसला होता. आम्ही त्याला विचारल भिवा तर खुणेनेच त्याने आम्हाला आत मध्ये जायला सांगितल. आम्ही आत जात असतानाच दोन कोंबड्या आमच्या पायातन जोरात पळत बाहेर गेल्या. आतमध्ये एक तरुण वळकटी मारुन आडवा झोपला होता तर त्याच्याच वयाची एक पोरसवदा मुलगी हातातल्या फुंकणीने फुक मारुन चुलीत जाळ करत होती. भिवा आहे का घरात, आम्ही दारातनच विचारल. कोण...हाय? तसा काळा सावळा पण काटक भिवा किलकिले डोळे करुन बाहेर आला. काय काम हाय जी? त्याने हळु आवाजात विचारल तस मी त्याला आमचा गडावर जाण्याचा बेत सांगितला. थोडेसे आढेवेढे घेतल्यानंतर तो तीनशे रुपयात आमच्याबरोबर वर यायला तयार झाला. त्याने आवाजानेच त्या मुलीला पाणी आणायला सांगितले. तशी ती काहीशा मंद चालीने दोन ग्लास घेऊन बाहेर आली. तिने वर चोळी आणि गुडघ्यापर्यंत पातळ नेसले होते व त्याचा पदर कमरेभवती गुंडाळला होता. एव्हाना भिवा तयार होऊन बाहेर आला. डोक्याला मुंडासे एका हातात कापडी पिशवी आणि कमरेला कोयता बांधुन अनवानीच तो आमच्याबरोबर येणार होता.

आम्ही निघणार इतक्यात मगापासुन गप्प बसलेला माणुस आमच्या दिशेने बघुन आक्रस्ताळेपणाने हातवारे करु लागला. एकंदर त्याच्या खुणांवरुन तो भिवाला आमच्या बरोबर जाऊच नको असं सांगत होता असच प्रथमदर्शी तरी वाटत होतं. त्याबद्दल भिवाला विचारल असता तो माणुस त्याचा बाप होता अस समजलं आणि त्याची हि अवस्था पुर्वी पासुन अशी नसुन काहीच दिवसापासुन झाली आहे अस समजलं. दोनच हप्त्यांपुर्वी तो डुकराच्या पारधीसाठी वरच्या जंगलात गेला असता त्या रात्री शिकार तर काय घावली नाही. पण तो जे परत आला तेच मुळी घामाघुम होऊन. जणु त्याने काहीतरी पाहिल असावं आणि भितीने त्याचा जो आवाज बसलाय ते आज पंधरावीस दिवस झाले तरी त्याला स्पष्ट बोलता येत नाही नुसता ईशार्‍यानेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. मधीच वरच्या जंगलाकडे हात दाखवतो आणि डोळे मोठे करुन उर बडवायला सुरवात करतो.

आता पंडीतने न राहावुन भिवाला विचारलच "भिवा वर काही वाईट गोष्टी तर नाहीत ना?
यावर भिवा म्हणाला, ''साहेब मी इथच ल्हानाचा मोठा झालो''. हा आता एखांद्याबारी वरच्या जंगलातन कसलं-कसलं आवाज येत्यात पण वर जनावर बी लई माजल्यात आणि आपण "येखादी गोष्ट येळत केली तर वाईट येळ तरी कशापाई येतीया". तसा भर दिसा भरपुर येळला मी गडावर फिरलुया, वर समदीकडे पडकं वाडे हायती. त्यातलाच येक मोठा वाडा आजबी जरा बर्या कंडिक्शन मधी हाये. भिवाच्या तोंडी मिंग्लिश शब्द ऐकुन मी आणि पंडीत जरासे हसलो व पुढे ऐकु लागलो. भिवाच्या मते त्याच वाड्यात एक गुप्त दरवाजा आहे. अस म्हणतात कि त्यातुन आत गेल की एक भुयार लागत जिथुन सरळ खालच्या वेताळाच्या मंदीरापर्यंत जाता येतय. वाड्याच्या समोरच एक उभा दगड आणि तळं असुन तळ्याच्या मागेच एक विचित्र झाड आहे. "मग तु कधी गेलास का त्या दरवाज्यातनं? पंडीतने खोचकपणे भिवाला विचारल. "न्हायबा, "आपल्या बाच्यान बी असलं धाडस व्हायच नाय, एक दोन बारी आसंच वाकुन बघितल त्या वाड्यात तर नुसत्या काळोखानंच भिती वाटली. आत जायचं तर लांबच राहीलं, उगाच ईषाची परीक्षा कशापाई? आणि आमचा भगत म्हणुतय त्या परमानं वर त्या वाड्यात भुताटकी हाय. आता मानला तर देव नायतर दगुडच, आणि जर देव मानताय तर भुताटकी बी असणारच की कारण दोन्हीबी गोष्टी दिसत न्हाईत पण त्यांच्या असण्याची जाणीव होती की न्हाय? भिवाच्या या उत्तराने आम्ही चिडीचुप होऊन पुढे ऐकु लागलो. आता बघा गेल्या येळला ती कोन गोरी माणस आली व्हती. आमच्या दादोसा ने सांगितल होतं कोनाला तरी वर घेऊन जा आणि सांच्याला माघारी फिरा पण ऐकली न्हाईत. ते जे वर गेले ते खाली आलेले कुणाला दिसलेच नाय. हा चार-पाच दिसांनी त्यांच सामान मात्र घावलं मला. ते केलं जमा पोलीस पाटलाकडे. हप्त्याभरानंतर अजुन तसलीच माणसं आली व्हती पोलीस घेऊन. समद शोधल पण काहीच पत्या नाय लागला बिचार्‍यांचा.

पुढे भिवा मधे पंडीत आणि मागे मी, उन आता बरयापैकी वर चढल होतं मधुन नागमोडी वाट आनि दुतर्फा जंगल. काही ठिकाणी तर भर दुपारी पण झांडाच्या शांत सावलीमुळे किर्रर्र काळोख पडला होता. पंडीत चालता चालता फोटो काढण्यात मग्न होता. पण माझ मन मात्र आजुबाजुच्या गुढ वातावरणात गुंतत चालल होतं. मगाशी भिवाच घर सोडल्यापासुन सतत कोणी तरी आमच्यावर नजर ठेऊन आहे अस वाटत होतं. मागे वळुन पाहील तर कोणीच नाही. एक दोनदा तर गवतातुन चालताना सळसळही जाणवली. बहुतेक माझा भास असावा. अर्ध्या पाऊन तासाने आम्ही एका अरुंद टेकडीवर येऊन पोचलो. भर उन्हातल्या तंगड तोडी मुळे मगाशी खाल्लेली मिसळ केव्हाच पचली होती. आम्ही जरा विश्रांती घेण्यासाठी थांबलो. आता वरुन उंचीवरुन हरवल गाव लगेचच नजरेला सापडत होतं. आमच्या डाव्या बाजुलाच आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट नागासारखी वळणे घेत खालीपर्यंत गेली होती. सुर्य आता पश्चिमेकडे कलल्यामुळे आम्ही उभे असलेल्या भागावर छान सावली पडली होती. थोडी ग्लुकोझ बिस्कीटे आणि पाणि रिचवल्यावर आम्ही पुढच्या चढाईसाठी मार्गस्थ झालो. पुढच वळण घेऊन जी चढणीची वाट लागली त्या वाटेवर आमचीपण चांगलीच वाट लागली. माझ्या आतमध्ये जो बिअर ग्रिल काल रात्री पासुन संचारला होता तोही आता थंडावला होता. तर पंडीत चालतोय की रांगतोय तेच कळत नव्हतं भिवा मात्र आत्ताच आंघोळ करुन आल्यासारखा फ्रेश दिसत होता तर आमचे चेहरे मात्र जत्रेत हरवलेल्या पोरांसारखे केविलवाणे दिसत होते. भिवाचं काटक शरीर आणि स्फुर्ती पाहुन खरच हेवा वाटला.

या सर्व दमखमीत एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सतत कोणी तरी आमचा पाठलाग करतय असा भास मला होत होता. एक दोन प्रसंगी तर मला शु....क्क, शु...क्क्क, असा ही आवाज आला. पण हा नक्की भास आहे की खरच कोणीतरी आपल्यावर पाळत ठेऊन आहे? या विचाराक्षनीच माझ्या अंगावर सर्रर्रकन काटा आला. पण दुसरयाच क्षणाला मी सावध झालो. काय साला आपण पण, आता जंगलातुन फिरतोय तर काड्याकुड्यांचा आवाज हा येणारच त्यात इतक घाबरण्यासारख काही नाही. बहुतेक ह्या दादोसा आणि भिवाच्या गोष्टी ऐकुन आपण जरा जास्तच सतर्क झालो आहोत.

अडीच तीन तासांच्या अथक परिश्रमांनंतर अखेरीस आम्ही गडावर येऊन पोहचलो. वर आल्या आल्या एक विचित्र गोष्ट आम्हाला जाणवली ती म्हणजे. सर्व रस्त्यात जाणवणारा आमचा उत्साहच एकदम गायब झाला होता. वारा पण एकदम पडल्यामुळे अंगभर घामाच्या धारा लागल्या होत्या. अचानक एकदम नकारात्मक विचार डोक्यात डोकाऊ लागले. पंडीत तर उगाचच इकडे आलो या विचारापर्यंत आला होता. अर्थात मलाही तसच वाटत होतं पण जर सेनापतीच खचला तर कस होणार? म्हणुन चेहरयावर खोट हसु आणुन मी वातावरण हलक करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या हातातील कंपास प्रमाने आम्ही गडाच्या उत्तर दिशेला उभे होतो व आमच्या समोरच गडाचा भव्य प्रवेशद्वार आमचं स्वागत करत होतं. शिरस्त्याप्रमाणे इथेही पंडीत ने आपली फोटोग्राफिची हौस फिटवुन घेतली. व आम्ही आतमध्ये मार्गस्थ झालो.

दुपारच रखरखीत ऊन चोहो बाजुंनी किरणांचा मारा करत होत. तश्यातच मी माझ्या बॅगेतला गडाचा मॅप काढला. मॅप प्रमाने जिथे आम्ही उभे होतो. त्या दरवाजापासुनच काही अंतरावर पाण्याची दोन तळी समोरासमोर शांत पहुडली होती. आणि मधुनच एक वाट सरळ थोड्या चढनीने वरच्या दिशेन जात होती. त्या चढावरच एक भग्न कोठी अखेरचे दिवस मोजत उभी असलेली दिसली. तर ठिकठिकाणी ऊंचच ऊंच गवत माजलेले दिसत होते. गडाच्या चहु बाजुने तटबंदी असुन काही ठिकाणी ती शाबुत असुन काही ठिकाणी भरपुर पडझड झालेली होती.तटबंदीवर जाण्यासाठी ठिक ठिकाणी पायरयाची व्यवस्था होती. गडाचे बुरुजही अखेरच्या घटका मोजत असताना दिसले. मधल्या वाटेनेच त्या कोठी पासुन जरा पुढे गेल्यावर पुन्हा दोन पाण्याची छोटी टाकी लागली पैकी एकातील पाणी पिण्याइतपत स्वछ दिसत होतं आम्ही आमच्या वॉटर बॉटल भरुन घेतल्या जरा फ्रेश झालो आणि पुन्हा पुढे चालु लागलो. मॅप मध्ये काढल्याप्रमाणे आमच्या सर्व गोष्टी बघुन होत आल्या होत्या. आता फक्त तो वाडा त्यातला तो गुप्त दरवाजा आणि सभोवतालचा परीसर बघायचा राहीला होता. आम्ही वाढलेल्या गवतातुन मार्ग काढत असतानाच अचानक कसला तरी किंचाळण्याचा विचित्र आवाज आला. आम्ही मागे वळुन बघे पर्यंत भिवा विजेच्या चपळाईने दोन तीन उड्यातच आमच्यासमोरुन नाहीसा झाला. भिवा तिथुन जाताक्षणीच एक गुढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणारया गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकु येत होते.